टोलेबाज न्यूज :
वणी : निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रत्येकाला सोशल मीडियातून प्रचार करण्याची मुभा आहे परंतु सामाजिक शांतता भंग होईल किंवा सामाजिक दृष्ट्या तणाव निर्माण होईल अशा सोशल मीडियावर पोस्ट टाकणाऱ्यावर कठोर कारवाईचे आदेश निवडणूक आयोगाने दिले असून नियमांच्या अधीन राहूनच पोस्ट टाकाव्यात. असे यवतमाळ पो. अधिक्षक कुमार चिंता यांनी केले.
यवतमाळ जिल्ह्यात नगरपरिषद व नगरपंचायतमध्ये प्रचाराची धूमाकुळ सुरु आहे कमी वेळात मतदारा पर्यंत सोशल मीडिया माध्यमातुन प्रचार सुरु आहे उमेदवारांनी आपल्या प्रचाराच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करण्यापूर्वी ती समाजात जातीभेद, अफवा, अपप्रचार समाजात अशांतता पसरनार नाही याची खात्री करून टाकाव्यात.
अशा सर्व सोशल मीडियाचा सर्व पोस्टवर सायबर पोलीसांचा वॉच असून कायद्याचे उल्लंघन केल्यास निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कोणतीही नोटीस न देता यात जामीनाशीवाय अटक, दंड व शिक्षेची तरतूद आहे. तरी सर्व उमेदवाराणी निवडणूक आयोगाचा अधीन राहून सामाजिक शांतता भंग होणार नाही याची खात्री करून पोस्ट टाकाव्यात अन्यथा कारवाई होणार.













