सोयाबीन पिकाला तातडीने गुणवत्तेनुसार योग्य भाव देण्याबाबत मनसेचे तहसीलदारांना निवेदन “

December 3, 2025

वणी : सोयाबीन पिकाला तातडीने गुणवत्तेनुसार योग्य भाव देण्याबाबत 03 डिसेम्बर 025 ला मनसे कडून वणी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे यावर्षीच्या सोयाबीन पिकाच्या गंभीर समस्या असून यावर्षी वणी तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त अतिवृष्टी झाल्यामुळे सोयाबीन पिकामध्ये नैसर्गिक बदल झाला आहे, ज्यामुळे शेतातील उभे सोयाबीन पीक काही प्रमाणात काळपट (रंग उतरलेला) झाले आहे.

हया पिकातील बदल नैसर्गिक असून, तो अतिवृष्टी मुळे झाला आहे, यात शेतकऱ्याचा कोणताही दोष नाही. सध्या, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (APMC) तपासणी अधिकारी मालामध्ये जाणीवपूर्वक किरकोळ दोष काढून सोयाबीन पिक अयोग्य ठरवून तो रद्द करत आहेत. परिणामी, शेतकऱ्यांना आपले पिक एकतर परत घरी घेऊन जावे लागत आहे किंवा नाईलाजास्तव खाजगी व्यापाऱ्यांना अत्यंत कवडीमोल भावाने विकावा लागत आहे.

या गंभीर परिस्थितीत, शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान थांबवण्यासाठी, प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा. ज्याप्रमाणे कपासीच्या पिकाला त्याच्या दर्जाप्रमाणे (Quality Grade) दर निश्चित केला जातो, त्याच धर्तीवर यावर्षीच्या सोयाबीन पिकालासुद्धा त्याच्या गुणवत्तेनुसार (उदा. रंग, ओलावा विचारात घेऊन) दर निश्चित करून तो खरेदी करण्यात यावा.आपण शेतकऱ्यांचे झालेले नुकसान आणि त्यांची वर्तमान आर्थिक स्थिती लक्षात घेऊन, या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन शेतकऱ्यांचेआर्थिक नुकसान थांबवावे.

असे मनसे नेते फाल्गुन गोहोकर,प्रमोद कोल्हे, लकी सोमकुवर, प्रवीण कळसकर, नितीन चहाणकर, रवी वनकर, रुपेश पेचे, धीरज भगवा, संतोष गोंडे, धीरज पेचे, आशिष चहाणकर, आशिष ठावरी, सुरज काकडे, प्रशांत शेंडे, अमोल लांबट यांनी दिले.