• मारेगावात पोळा उत्सहात
• मार्डीरोड वरील खड्डयांनीही वेधले लक्ष.
टोलेबाज न्यूज वार्ता : रवि घुमे
मारेगाव : तालुक्यात सर्वच गावखेड्यात पोळा सण उत्साहात साजरा झाला. मारेगाव शहरात तब्ब्ल दिडशे च्या वर बैल जोड्यांच्या सहभागाने यांत्रिक युगातही बैलांचं असाधारण महत्व लक्षात आलं.भारत हा कृषिप्रधान देश असून पूर्वी कृषी ही शंभर टक्के बैलजोड्यावरच अवलंबून होती मात्र विज्ञानाने प्रगती होत गेली व यंत्र क्रांती उदयास आली ह्या क्रांतीने शेतकऱ्यांची अवघड कामं सुलभ झाली व हळूहळू बैल जोड्यांची जागा ट्रॅक्टर,जेसीबी ने घेतली पण बैलाच्या मदतीने जी कामं केली जातात ती यंत्रांना जमणार नाही, नेमकी याचीच प्रचिती आज पोळ्यामध्ये आली. भारतात बैल हा शेतकऱ्यांचा मित्र आहे.मात्र शेती मशागतीसाठी अस्तित्वात आलेली वेगवेगळी यंत्रामुळे बैल पाळणे सुद्धा लोकांना कठीण काम वाटते. परंतु पूर्वीच्या काळी प्रत्येक घरामध्ये बैलगाडी असायची त्यावर बसून शेतामध्ये जायचे, शेतातील कामे बैलांच्या मार्फत होत होते. पूर्वी बैलांचा वापर शेतामध्ये नांगर करण्यासाठी व शेतातील निघालेले पीक घरी नेण्यासाठी किंवा अवघड काम करण्यासाठी केला जायचा. आता सुद्धा ग्रामीण भागामध्ये ही कामे होताना आपल्याला दिसतात. परंतु बैलांच्या संख्येमध्ये आता खूप मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. उत्स्फूर्त भरलेल्या पोळ्यात मात्र मारेगाव मार्डी रोड वर पडलेले मोठमोठे खड्डे जणू बघ्यांना वाकुल्या दाखवत होते.













