शाळेच्या पाडल्याची खोट्या तक्रार कर्त्यांची पोलखोल

September 27, 2025

वणी : सविस्तर खुलासा……………या तीन वर्गखोल्या निर्लेखन करण्याची मंजुरात 1)मा.शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद यवतमाळ यांचे पत्र क्रमांक /यजीप/शिवी/प्राथ/वशि/2120/2025 दिनांक 18/07/2025 ला या आदेशानुसार दिली आहे.
2.) तसेच मा.गटविकास अधिकारी,पंचायत समिती वणी यांनी पसव/वि अ(सां)/निर्लेखन/बानी/272/2025 दिनांक 30/07/2025 या आदेशानुसार वर्गखोल्या निर्लेखन करण्याचा आदेश सरपंच व सचिव ग्राम पंचायत यांना दिला आहे.
3)मा.ग्रामपंचायत विरकुंड यांनी मासिक सभेत वर्गखोल्या पाडण्याचा ठराव मंजूर केला.ठराव क्रमांक 7 सभा दिनांक 29/8/2025
4)मा.शाळा व्यवस्थापन समिती, नवेगाव विरकुंड यांनी सुद्धा मासिक सभेत 3 वर्गखोल्या नियमानुसार पाडण्याचा ठराव घेतलेला आहे.
5) मा.सरपंच व सचिव ,ग्रामपंचायत विरकुंड यांनी 3 वर्गखोल्या नियमानुसार पाडण्याचे काम श्री.पियुष चव्हाण यांना दिले.
6) वर्गखोल्या पाडल्या नंतर मा.सरपंच व सचिव ,ग्रामपंचायत विरकुंड यांनी वर्गखोल्या नियमानुसार पाडल्या असल्याचे माहिती चे पत्र मा.गटविकास अधिकारी,वणी यांना दिले.

दिनांक 22/9/2025 ला .शासन नियमाचे अधीन राहून वरील प्रमाणे पूर्ण प्रक्रिया पार पाडूनच नियमानुसार शाळेच्या 3 वर्गखोल्या निर्लेखीत (पाडल्या) आहेत.यात कोठेही हयगय झालेली नाही. मागील 2 ते 3 वर्षांपासून या जीर्ण वर्गखोल्या पाडण्याचे ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समिती कडून नियमानुसार प्रस्ताव पंचायत समिती मार्फत जिल्हा परिषद कडे गेले होते त्या नुसारच नियमानुसार वरील सर्व प्रक्रिया झालेली आहे.आपल्या शाळेच्या जुन्या जीर्ण वर्गखोल्या झाल्या होत्या, त्यात भिंती मध्ये भेगा पडल्या होत्या , त्यात अनेकदा साप व इतर कीटक निघत होते तसेच या खोल्या धोकादायक झाल्या होत्या , त्यामुळे मुलांना बसण्यास या खोल्या धोकादायक होत्या त्यामुळे इतर गावात जश्या छान नवीन शाळेच्या खोल्या बांधकाम होत आहे तसे आपल्याही शाळेत व्हावे म्हणून आपल्या शाळेतील उत्साही शिक्षक श्री.देवेंद्र बच्चेवार सर यांनी स्वतः च्या खर्चाने अनेक चकरा यवतमाळ ला मारून सर्व अधिकारी यांना भेटून या वर्गखोल्या पाडण्याचे प्रस्ताव मंजूर करून आणले.

त्यानंतर ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समिती च्या पुढाकारात नियमानुसार या 3 वर्गखोल्या पाडण्यात आल्यात.या वर्गखोल्या पाडण्याचे खर्चाचे इस्टीमेट पंचायत समिती कार्यालयात उपलब्ध आहे.वर्गखोल्या पाडण्याकरिता शासनाकडून कोणताही आर्थिक निधी मिळत नसतो.तर तो खर्च या वर्गखोल्याचे निघणारे सामान विकून भागवायचा असतो त्यात रक्कम कमी पडल्यास ग्रामपंचायत नी उर्वरित रक्कम भरपाई करून द्यायची असते व या सर्व सामानाची विल्हेवाट ही नियमानुसार लावण्याचे अधिकार ग्रामपंचायत ला आहे.

हे सर्व शासन नियम आहेत.त्यानुसार इस्टीमेट पेक्षा जास्त खर्च पाडण्यासाठी लागणार होता त्यामुळे इस्टीमेट आहे तेवढया खर्चातच या वर्गखोल्या पाडाव्यात व त्या बदल्यात टिन पत्रे, लोखंडी सामान , लाकडी सामान व इतर मटेरियल ठेकेदाराला देण्याचे करारानुसार ग्रामपंचायत ने ठरवले होते.जास्तीचे एकही पैसे ठेकेदाराला दिले नाहीत. वर्गखोल्या च्या निघालेल्या समानातच हे सर्व काम श्री.पियुष चव्हाण ठेकेदार यांचे कडून करून ग्रामपंचायत ने करून घेतले. आताही शाळेत पडून असलेल्या मटेरियल ची मालकी ठेकेदार यांची आहे. या सर्व कामात शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांचा काहीच सहभाग नसून हे सर्व काम करण्याचा अधिकार मा.गटविकास अधिकारी यांनी ग्रामपंचायत ला दिल्याने ग्रामपंचायत ने नियमानुसार सर्व कार्यवाही पूर्ण केली.

तरीपण कोणत्याही प्रकारची पूर्ण माहिती न घेता गावातील काही लोकांनी या कामा बाबत निरर्थक आक्षेप घेऊन शाळेमध्ये जाऊन विनाकारण काहीही चूक नसताना तेथील मुख्याध्यापक व शिक्षकांना त्रास दिला.ही बाब अत्यंत निंदनीय आहे.तसेच याच काही गावातील लोकांनी मा.गटविकास अधिकारी वणी यांचे कडे तक्रार नेली असता गटविकास अधिकारी साहेबानी वरील सर्व कामे ही नियमानुसार झाली आहे असे ठणकावून सांगितले. त्यामुळे विनाकारण ग्रामपंचायत व शाळेला बदनाम करण्याचा काही लोकांचा मानस असून ते आपल्या स्वतःचे अस्तित्व दाखवण्याचा गैर हेतूने नाहक गावाची बदनामी करत आहेत. तरी सर्व ग्रामस्थांनी हा खुलासा वाचून व या सोबत असलेले सर्व आदेश पाहून खात्री करावी व गावाची बदनामी करणाऱ्यांचे षडयंत्र हाणून पाडावे.
नवीन वर्गखोल्या मंजूर करून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे.अशी मी सर्व नागरिकांना विनंती करतो