पिकाचे नुकसान पाहून शेतकऱ्याची आत्महत्या

October 28, 2025

मारेगाव : नापिकीच्या ताणाला कंटाळून एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना रोहपाट (डुब्ली पोड) येथे घडली आहे. मृत शेतकऱ्याचे नाव भिमा तुकाराम आत्राम (वय 61) असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भिमा आत्राम हे रोजप्रमाणे सकाळी शेतावर गेले होते. मात्र पिकाचे नुकसान पाहून ते घरी परतले आणि मुलगा तुकाराम यांना “यंदा काही खरे नाही, पिकं गेली” असे सांगून खाली कोसळले. त्यांना तातडीने मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.विषबाधेमुळे मृत्यू झाल्याचे प्राथमिक निष्कर्ष असून, घटनेची नोंद मारेगाव पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.भिमा आत्राम यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.