वणी : दिनांक २४सप्टेंबर२०२४ला मुंबई येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती शिक्षक संघटनेची राज्यस्तरीय बैठक संपन्न झाली.
या बैठकीस राज्यातील अनेक शिक्षक संघटनांचे राज्याध्यक्ष, राज्य सचिव व प्रतिनिधी उपस्थित होते.या सभेतील प्रमुख विषय
◼️टीईटी परीक्षा दोन वर्षांत उत्तीर्ण होण्याबाबत न्यायालयाचा निर्णय सर्वांवर बंधनकारक आहे.
◼️ जर परीक्षा पास झाले नाही तर सक्तीने सेवानिवृत्त व्हावे लागेल.
◼️ या निर्णयाचा फेरविचार व्हावा म्हणून शासनाने मा. सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी.
👉 शासनाने 3 ऑक्टोबर 2025 पर्यंत पुनर्विचार याचिका दाखल केली नाही तर
📌 दि. 4 ऑक्टोबर 2025 रोजी महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर शिक्षकांचा मूक मोर्चा काढण्यात येईल.
📢 सर्व जिल्ह्यातील शिक्षक संघटनांनी आजपासूनच मूक मोर्च्याची तयारी करावी.
🗣️ येत्या काही दिवसांत जिल्ह्यातील शिक्षक संघटनांच्या बैठका घेऊन आंदोलनाचा संदेश सर्व शिक्षकांपर्यंत पोहोचवावा.
✊ एकजूट करून वज्रमूठ बांधण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.
⚖️ कायदेशीर चर्चा :
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती शिक्षक संघटनेच्या वतीने मा. उच्च न्यायालयाचे सीनियर ॲड. माननीय सुरेश पोकळे यांच्याशी प्रदीर्घ चर्चा करण्यात आली.
त्यानंतर ठरल्याप्रमाणे माननीय मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री व मुख्य सचिव – महाराष्ट्र शासन यांना निवेदन सादर करण्यात आले.
केशवराव जाधव (राज्याध्यक्ष),
देविदास बसवदे (सल्लागार),
प्रसाद पाटील राज्य संघटक ,
साजीद निसार अहमद (राज्य कोषाध्यक्ष)
युवराज पोवाडे (राज्य उपाध्यक्ष)
चिंतामण वेखंडे (राज्य संघटक)
यादव पवार (राज्य कार्यालय चिटणीस)
विकास खांडेकर (राज्य सरचिटणीस)
भरत शेलार (राज्य कार्याध्यक्ष)
प्रसाद अनंत म्हात्रे (राज्य सरचिटणीस),वसंत सदानंद मोकल पुरोगामी शिक्षक संघटना रायगड जिल्हाध्यक्ष
तथा प्रतिनिधी सदस्य
पुरोगामी प्रा. संघटना
सुरेश रामराव खरात
चंद्रकांत केशवराव दामेकर
व इतर पदाधिकारी उपस्थित असल्याची माहित महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष मनिष राठोड, यवतमाळ जिल्हा सरचिटणीस आनंदकुमार शेंडे यांनी दिली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील शिक्षकांनी मूक मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन ही करण्यात आले.
वणी
वीज कोसळून बैलाचा मृत्यू; शेतकरी किरकोळ जखमी
मारेगाव:तालुक्यातील श्रीरामपूर (कुंभा) येथे आज दिनांक २६ सप्टेंबर २०२५ रोज शुक्रवारला दुपारी २ वाजताच्या सुमारास वीज कोसळून एक बैल जागीच ठार झाला, तर शेतकरी किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली.
गोपाळ मारोती शेंडे (वय ५५, रा. कुंभा) असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. शेंडे हे नेहमीप्रमाणे आपल्या श्रीरामपूर (कुंभा) येथील गट क्रमांक ३ मधील शेतात बैल चारण्यासाठी गेले होते. दुपारी दोन वाजताच्या सुमारास अचानक ढग दाटून आले आणि विजांचा कडकडाट सुरू झाला. याच दरम्यान शेंडे यांच्यावर वीज कोसळली. यात त्यांचा एक बैल (अंदाजे किंमत १ लाख रुपये) जागीच मृत झाला.
घटनेत शेंडे हे सौभाग्याने बचावले असून त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. गावकऱ्यांच्या मदतीने त्यांना तातडीने मारेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घटनेची माहिती होताच तलाठी कमलेश अनिल सुरावार यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या अनपेक्षित घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
बस चालकाला शिवीगाळ करत मारहाण.
फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्हे दाखल
वणी : आज दिनांक २६/०९/२०२५ रोज सकाळी सुमारे ६:१५ वाजताचे दरम्यान महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वणी आगारातील बस क्रमांक MH 40 AQ 6062 ची बस शालेय विद्यार्थी आणण्यासाठी बोर्डा गावात जात असताना, विरकुंड ते बोर्डा या मार्गावर एका शेताजवळील रोडवर समोरून येणाऱ्या मोटरसायकल चालकाने त्याला अडथळा आणला.
बस चालकाने रस्ता दिला असता, मोटरसायकल चालकाने समोरून न जाता बस चालकावर फुकटची नौकरी लागल्याचा आरोप करत शिवीगाळ केली. त्यानंतर मोटरसायकल चालकाने बस चालकाचा कॉलर पकडून बस बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी बसचा वाहक संजय नान्ने मदतीला धावून आला असता, मोटरसायकल चालकाने लाकडी काठीने बस चालकाच्या उजव्या खांद्यावर मारहाण केली.
मोटरसायकल चालकाचा क्रमांक MH 29 BW 8150 असून, त्याचे नाव पायघन रा. बोर्डा असे असून त्याने शासकीय कामात अडथळा आणल्याची तक्रार फिर्यादीने पोलिस ठाण्यात दिली आहे.
फिर्यादी च्या जबानी तक्रारीवरून संबंधित युवकावर बीएनएस च्या कलम 132, 121 (1), 352 नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वणी पोलीस स्टेशन चे सपोनि निलेश अपसुंदे करत आहे.
रंगनाथ स्वामी ना. प. संस्थेच्या वतीने उद्या शनिवारला सभासद मेळावा
•आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाचे औचित्य
टोलेबाज वार्ता पत्र : रवि घुमे : मारेगाव
आंतराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ च्या निमित्ताने मारेगाव येथे उद्या दि. २७ सप्टेंबर ला स्थानिक शेतकरी सुविधा केंद्रात सभासद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण सभासद मेळाव्याचे उदघाट्क आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रंगनाथ स्वामी ना. सह. पत संस्थेचे अध्यक्ष अँड. देविदासजी काळे कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील तर राज्य पतसंस्था फेडरेशन अध्यक्ष राजूदास जाधव हे प्रमुख अतिथी असतील.
शनिवारला दुपारी १२. ३० वाजता सुरु होणाऱ्या सभासद मेळाव्यास उपविभागातील मान्यवर तथा सभासदांनी प्रामुख्याने उपस्थित राहण्याचे आवाहन पतसंस्थेचे उपाध्यक्ष विवेकानंद मांडवकर, संचालक परिक्षित एकरे, सुधीर दामले, हरीशंकर पांडे, रमेश भोंगळे, सुरेश बरडे, अँड. घनश्याम निखाडे, डॉ. भूपाळराव पिंपळशेंडे, चिंतामण आगलावे, पुरुषोत्तम बद्दमवार, उदय रायपुरे, लिंगारेड्डी अड्डेलराव, अरविंद ठाकरे,सुनील देठे, छायाताई ठाकुरवार, निमाताई जिवणे, मुख्य. कार्य. अधिकारी संजय दोरखंडे,शाखा व्यवस्थापक संतोष घुगुल यांनी केले आहे.
मार्डी येथील उभाठाचे उपोषण तुर्तास मागे -फंड नको शेतमालाला योग्य भाव द्या-आ.संजय देरकर
टोलेबाज वार्ता पत्र :रवि घुमे : मारेगाव
पावसाच्या अघोरी रुपड्यानं शेतकऱ्यांच्या तोंडचं पाणी पळवलं असतांना शेतीवाडया सहित वस्त्यांचही नुकसान होऊन शेतकरी मेटाकुटीस आला. मात्र सरकारने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्या ऐवजी जिल्हा वगळला होता. सरकार विरोधकांना फंड देत नाही,चालेल आम्हाला फंड नको तर शेतकऱ्यांना त्याच्या मालाला योग्य भाव द्या असे प्रतीपादन वणी विधानसभेचे आमदार संजय देरकर यांनी मार्डी येथील उपोषण मंडपात उपस्थीत शेतकऱ्यां समोर बोलतांना केले.
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे तालुका शाखा मारेगावच्या वतीने मार्डी येथे तीन दिवसा पासून विविध मागण्यासाठी उपोषण सुरु होते. या समस्या मध्ये ओला दुष्काळ जाहीर करणे, रस्ते खड्डेमुक्त करणे, विजेचा लंपडावा पासून मुक्ती, १३२ के.व्ही.सबस्टेशन सुरु करणे,अवैध व्यवसाय बंद करणे इत्यादी मागण्याचा समावेश होता.सलग तीन दिवस उपोषण करून तिसऱ्या दिवशी उपोषणाची सांगता करण्यात आली.
दरम्यान आ.देरकर यांनी उपोषण मंडपात भेट देऊन सबंधीत अधिकाऱ्यांशी चर्चा केली. चर्चे अंती उपोषणकर्त्याचे लेखी आश्वासनावर समाधान झाल्या नंतर आ.देरकर यांचे हस्ते उपोषण कर्त्यांना सरबत पाजुन उपोषण सोडले. यावेळी तहसिलदार उत्तम निलावाड, मारेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्क ठाणेदार विक्की जाधव, विद्युत विभागाचे अभियंता शामसुंदर कुर्रा, उप अभियंता नरेंद्र खटारे,जिल्हा परिषदेचे अभियंता संजय शिंदे,यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते.
मार्डी येथील बाजार चौकात बेमुदत उपोषणास बसलेल्या आंदोलनकर्त्यां मध्ये तालुका प्रमुख पुरुषोत्तम बुटे, सचिव दिवाकर सातपुते, संपर्क प्रमुख सचिन पचारे, उपतालुका प्रमुख विजय अवताडे,माजी खरेदी विक्री उपाध्यक्ष शरद ताजणे या पाच पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.यावेळी आ.देरकर यांच्या सोबत शिवसेना नेते,प्रशांत पाचभाई,जिल्हा प्रमुख संजय निखाडे,विधानसभा प्रमुख सुनिल कातकडे,जिल्हा संघटक सुधिर थेरे,उप जिल्हा संघटीका सरपंच डिमनताई टोंगे,नगराध्यक्ष डॉ.मनिष मस्की सोबत होते. लेखी आश्वासनाची पुर्तता न झाल्यास आंदोलन पुन्हा तीव्र करण्याचा ईशारा देऊन उपोषण मागे घेण्यात आले.
वंचित बहुजन आघाडीचा बहुजनसासह एल्गार
– तहसीलदारांना निवेदन
टोलेबाज वार्ता : रवि घुमे : मारेगाव :
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष निरंजन वाघमारे यांचे नेतृत्वात वणी विधानसभा प्रमुख राजेंद्र निमसटकर यांनी सर्वधर्मीय बहुजनांसोबत मोर्चा काढत तहसीलदारांना निवेदन दिले.
बिहार बुद्धगया येथील महाबोधी विहाराच्या व्यवस्थापनाचा आणि नियंत्रणाचा वाद बौद्ध संघटना व इतर समाज यांच्यात सुरु आहे. बौद्ध संघटनांनी हे विहार बौद्ध भिक्षुच्या ताब्यात देण्याची मागणी केली आहे. यासाठी देशभर आंदोलनेही केली जात आहे. या मागणीला पाठिंबा म्हणून मारेगाव तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मारेगाव तहसीलवर हजारो कार्यकर्ते व शेतकरी मोर्चाचा एल्गार पुकारत प्रशासनाला निवेदन दिले.
मारेगाव बदकी भवन येथून निघालेल्या मोर्चाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ.निरज वाघमारे, वणी विधानसभा प्रमुख राजू निमसटकर यांनी केले. हजारो महिला पुरुषांची उपस्थिती असलेल्या मोर्च्यात महाविहार बौद्ध भिक्षुच्या ताब्यात द्या.. सनातनी व्यवस्थेतून मुक्तता करा, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करून सातबारा कोरा करा, मारेगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करा आदी मागण्या आणि घोषणा करीत हजारो मोर्चेकरी मारेगाव तहसील कार्यालयात धडकले.
मेळाव्यात विविध सामाजिक, धार्मिक आणि शेतकरी विषयक प्रश्नांवर चर्चा झाली. त्यानंतर तहसीलदार मार्फत प्रशासनास मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. येथे सरकारच्या तुघलकी धोरणाचा निषेध करीत प्रहार करण्यात आला.
यावेळी वणी – मारेगाव तालुक्यातील पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती.
दरम्यान, महाबोधी विहार बौद्ध धर्मियांचे पवित्र स्थान असलेले महाविहार अन्य धर्मियांच्या ताब्यात का ? सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी बांधल्या गेलेले जगभरातील समस्त बौद्धाचे पवित्र श्रद्धास्थान आणि प्रार्थनास्थळ असलेल्या जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट असलेल्या बोद्धगया येथील महाबोधी विहारास सनातनी व्यवस्थेतून मुक्तता कधी मिळणार? हा प्रश्न कित्येक वर्षांपासून विचारल्या जात आहे.गेल्या अनेक महिन्यापासून विविध अडचणी व अडथळ्यावर मात करून भारत व जगभरातील भिखुंन्नी विहाराच्या आंदोलनाचा लढा उभारला आहे
यवतमाळ पोलिसांतर्फे आदर्श दुर्गा उत्सव स्पर्धा ऑपरेशन प्रस्थान
टोलेबाज न्युज वार्ता :अभय गावंडे,यवतमाळ
यवतमाळ पोलिसांच्या वतीने दुर्गा उत्सवास प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने प्रोत्साहन बक्षीस देण्याचा उपक्रम राबविण्यात येत असून, नागरिकांच्या सहकार्याने दीर्घ उत्सव सुरक्षित पार पडावा व शांत व शहरातील शांतता व सुव्यवस्था अबाधित राखत दुर्गा उत्सवाची सांगता व्हावी या उद्देशाने हा उपक्रम राबविल्या जात आहे. यासाठी पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री कुमार चिंता यांच्या नेतृत्वात पार पाडण्याची ही संकल्पना आहे
या स्पर्धेचे नियम, अटी व गुण
1.दुर्गा स्थापना व विसर्जन मिरवणूक डी. जे. मुक्त्त असावी -15 गुण
2.पारंपरिक वाद्यांचा वापर -05 गुण
3.रहदारीस अडथळा नसावा -10 गुण
4.अमली पदार्थ, दारू व नशा यावर निर्बंध -10 गुण
5.सामाजिक उपक्रम (रक्तदान, ओरोग्य शिबीर, वृक्षारोपण )-10 गुण
6.मंडळ परिसर स्वच्छ व सी. सी. टीव्ही कॅमेऱ्याची व्यवस्था -10 गुण
7.जेष्ठ नागरिक व महिलांचा सहभाग -10 गुण
8.शासकीय योजनेचा प्रचार व प्रसार -10 गुण
9.सामाजिक संदेश देणारे देखावे -10 गुण
10.पर्यावरपूरक साहित्याचा वापर -10 गुण
प्रोत्साहन बक्षीस
प्रथम बक्षीस रू. 25000 आणि प्रमाणपत्र
द्वितीय बक्षीस रू. 21000 आणि प्रमाणपत्र
तृतीय बक्षीस रू. 15000 आणि प्रमाणपत्र
प्रोत्साहन रू. 11000 आणि प्रमाणपत्र
उद्या २५ ला मारेगावात वंचितचा ‘आक्रोश मोर्चा’
राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जयंतीचे औचित्य
समाजाचा आक्रोश आणि मागण्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचण्यासाठी एल्गार
टोलेबाज न्युज वार्ता :रवि घुमे, मारेगाव
मारेगाव : परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आज भारतीय समाज अनेक समस्यांनी ग्रासलेला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या मते, सत्ताधारी मनुवादी व्यवस्था आजही वंचित, शोषित, आदिवासी, सर्वहारा कष्टकरी, शेतकरी, बहुजन समाजावर अन्याय करीत आहे आणि त्याचे परिणाम म्हणून समाज वेगवेगळ्या गटात विखुरलेला आहे. या परिस्थितीत, समाजाला एकत्र आणण्यासाठी आणि सत्तेच्या राजकारणात एक बलशाली पक्ष म्हणून उदयास येण्यासाठी “वंचित बहुजन आघाडीने” कंबर कसली आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल यांसारख्या मातृसंघटनांना बळकट करून, सामाजिक संघटन मजबूत करण्याचा निर्धारही वंचित बहुजन आघाडी तालुका मारेगावचे वतीने करण्यात आला आहे. समाजाला यापुढे गप्प न बसता अन्यायाविरोधात आवाज उठवण्यास प्रवृत्त करणे, हे या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
मारेगाव येथील “बदकी भवन” मंगल कार्यालयाचे भव्य सभागृहात २५ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता कार्यकर्ता मेळावा होणार आहे. या मेळाव्यात वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते समाजाच्या सध्याच्या स्थितीवर चिंतन करतील. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या ‘संघटित व्हा’ या संदेशाची आठवण करून देत, समाजाने कशा प्रकारे एकजुटीने काम केले पाहिजे, यावर विचारमंथन होईल. हा मेळावा केवळ एका राजकीय पक्षाचा कार्यक्रम नसून, समाजाला नवी दिशा देणारा आणि त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणारा एक महत्त्वाचा टप्पा असेल.
मेळाव्यानंतर, समाजाच्या प्रमुख मागण्यांसाठी ‘आक्रोश मोर्चा’ काढण्यात येणार आहे. हा मोर्चा मारेगाव तहसील कार्यालयावर धडक देईल आणि प्रशासनाला निवेदन सादर करेल. या मोर्चाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष डॉ. नीरज वाघमारे यांचे सह जिल्हा पदाधिकारी करणार आहेत. समाजाचा आक्रोश आणि मागण्यांचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवणे, हे या मोर्चाचे उद्दिष्ट आहे.
प्रमुख मागण्या…
१) महाबोधी महाविहार
बौद्धांच्या ताब्यात द्या.
बौद्ध धर्मियांसाठी सर्वात पवित्र स्थळ असलेल्या बोधगया येथील महाबोधी महाविहाराचे व्यवस्थापन आजही हिंदू धार्मियांचे ताब्यात आहे. त्याचे हिंदूकरन केल्या जात आहे आणि ते पवित्र स्थळ अजूनही बौद्ध धर्मियांच्या पूर्णपणे नियंत्रणाखाली नाही. त्यामुळे, या महाबोधी महाविहाराचा कारभार तात्काळ बौद्ध धर्मियांच्या ताब्यात द्यावा, महाबोधी महाविहार पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे अशी तीव्र मागणी या मोर्चातून करण्यात येणार आहे.
२) शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करा, सातबारा कोरा करा.
विदर्भासह संपूर्ण राज्यातील बळीराजा शेतकरी अनेक वर्षांपासून नैसर्गिक आपत्ती आणि आर्थिक संकटांशी झुंज देत आहेत. यंदाच्या अतिवृष्टीने तर त्यांना पूर्णपणे उद्ध्वस्त केले आहे. त्यामुळे, सरकारने कोणताही विलंब न करता शेतकऱ्यांचे सर्व कर्ज सरसकट माफ करावे आणि त्यांचा सातबारा कोरा करावा, अशी मागणी आक्रोश मोर्चाचे माध्यमातून करण्यात येणार आहे.
३) ओला दुष्काळ जाहीर करा.
अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी खरीपाची पिके पूर्णपणे वाया गेली आहेत. निसर्गाने शेतकऱ्याच्या तोंडचा घास हिरावला आहे. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेऊन शासनाने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात येत आहे.
देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात सर्वहारा-आदिवासी-शोषित-वंचितांच्या न्यायाची लढाई लढणारा एकमेव लढवय्या म्हणून, उभा समाज आदरणीय श्रद्धेय प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्याकडे बघतो आहे. परमपूज्य बाबासाहेबांच्या स्वप्नपूर्तीसाठी केवळ “वंचित बहुजन आघाडी” हाच एकमेव राजकीय पर्याय आणी सत्य आता आपल्या सर्वांसमोर आहे. म्हणूनच, “वंचित बहुजन आघाडी” हा सत्तेच्या राजकारणात बलशाली राजकीय पक्ष व्हावा, आक्रोश मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राजू निमसटकर यांनी केले आहे.
पांढरकवडा पोलिसांचा अवैध जुगार अड्ड्यावर छापा
5,84,140 रुपयाचा मुद्देमाल जप्त
टोलेबाज न्युज वार्ता :अभय गावंडे, यवतमाळ
पांढरकवडा : पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ता. 22 च्या सायंकाळी पाटणबोरी येथे जाकपॉट वाईनबारच्या मागे रूम मधे सुरु असलेल्या जुगारावर छापा मारत 5 लाखाचा मुद्देमाल जप्त केला.
प्राप्त माहिती अशी की,राष्ट्रीय महामार्ग 44 वर पाटणबोरी गावानाजिक असलेल्या जॅकपॉट वाईन बारच्या मागे असलेल्या बंद खोलीत जुगार खेळत असलेल्या 20 जुगारांना व विनापरवाना अवैध चालवत असलेल्या अड्डा मालक शेख आसिफ शेख चांद याच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमानुसार कारवाई केली.
सदर कारवाईत 20 जुगारांना ताब्यात घेण्यात आले असून आरोपी ओम संजय शिर्तावार हा फरार आहे. घटनास्थळावरून जुगार डावावर रु. 43,000 रोख, 18 मोबाईल नग,तास पत्ते 24 नग,2 दुचाकी वाहन,20 नग खुर्च्या, 5 नग टेबल असा एकूण अंदाजे 5,84,140 रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात पांढरकवडा पोलिसांना यश आले.
अटकेत असलेले शेख आसिफ शेख चांद पारवा, शेख नासिर शेख मदार आदिलाबाद तेलंगणा,शेख रउफ शेख उस्मान आर्णी,शेख रहमान शेख अब्दुल घाटंजी,राजू नानाजी वाघ घाटंजी,सद्दाम रज्जाक शेख घाटंजी,अंकुश केशव नागेकर तिवसाळा ता. घाटंजी,दत्ता लक्षमन कापडे कोदुरी ता. केळापूर,सतिष पिराजी अंडेवार आदिलाबाद,मालारेड्डी शेकन्ना पानोजवार पाटणबोरी, पंकज रंजनराव भोयर घुबडी ता. केळापूर, नामदेव जीवन नव्हाते घाटंजी,रुपेश भाऊराव भोयर खापरी ता. घाटंजी,राजेश शिवप्रसाद धूत भुक्तापूर आदिलाबाद,आशिष संतोष करनमावर मांडवी ता. जारीजामणी,रामकिसन माधव किनाके टेम्भी ता. केळापूर, राजेश उद्धव बोबडे घाटंजी, उदय महेश गुप्ता घाटंजी, फिरोज अयुब खान आर्णी, आकाश रामराव मोहिते पारवा.
सदर कारवाई माननीय पोलीस अधीक्षक कुमार चिंता यवतमाळ, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी रॉबिन बंसल पांढरकवडा यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक दिनेश झांबरे यांचे नेतृत्वात सपोनी सागर पेंढारकर पोहेकॉ गजानन पत्रे पोहेकॉ राम राठोड, नापोकॉ किशोर आडे,पोशी विवेक ध्यावर्तीवार पोशी सूर्यकांत गीते यांनी पार पाडली. पुढील तपास सपोनी सागर पेंढारकर पो. स्टे. पांढरकवडा हे करत आहे.
बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करू नये
झरीजामणी तालुका सकल आदिवासी समाजाचे निवेदन.
टोलेबाज न्युज वार्ता :
झरीजामणी : बंजारा/ लंबाडा समाजाला अनुसूचित समाजात समाविष्ट करण्याची मागणी जोर धरत असतांनाच आदिवासी बांधवांकडून कडाडून विरोध होतांना दिसत आहे. यासंदर्भात झरीजामणी तालुक्यातील आदिवासी बांधवानी मा. राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व आदिवासी विकास मंत्र्यांना झरीजामणी तहसीलदारमार्फत निवेदन सादर केले.
निवेदनात म्हटले आहे की, ‘बंजारा’ समाजाचा उगम व्यापारी व भटक्या समाजात असून त्यांनी आदिवासींच्या घटनात्मक निकषांपैकी एकही निकष पूर्ण केलेले नाहीत. १९५० च्या राष्ट्रपती आदेशात व पुढील सुधारणांमध्ये बंजारा समाज अनुसूचित जमातीच्या यादीत नाही. तसेच १९५३ च्या काकासाहेब कालेलकर आयोगाने व मुंबई राज्याच्या यादीनुसार बंजारा/लंबाडा समाज ओबीसी प्रवर्गात नोंदविला आहे.
१९७९ मध्ये महाराष्ट्र शासनाने बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला होता. मात्र निकष पूर्ण न झाल्यामुळे तो प्रस्ताव १९८१ मध्ये मागे घेण्यात आला होता. “४४ वर्षांपूर्वी जे निकष पूर्ण झाले नाहीत, ते आता २०२५ मध्ये कसे पूर्ण होऊ शकतात, हा मोठा प्रश्न आहे,” असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
प्रमुख मागण्या :
१) बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करू नये.२) मा. राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली सर्व आदिवासी आमदारांची बैठक घेण्यात यावी.३) जात पडताळणी कायदा २००० मध्ये सुधारणा कराव्यात.४) शासनातील ८५ हजार रिक्त पदे व आदिवासी आरक्षणातील रखडलेली १२,५०० पदे तात्काळ भरण्यात यावीत.५) अनुसूचित क्षेत्रातील १३ जिल्ह्यातील संवर्ग पदांची भरती व नियुक्त उमेदवारांना कायम करण्यात यावे.६) आश्रम शाळांमधील खाजगीकरणाचा GR रद्द करून वर्ग ३ व ४ कर्मचारी पुन्हा नेमण्यात यावेत.७) DBT पद्धतीतून विद्यार्थ्यांना होस्टेलबाहेर काढण्याची प्रथा बंद करण्यात यावी.













