शिवसेना शिंदे गट मारेगाव शहर कार्यकारिणी गठित

सदर कार्यक्रमात मारेगाव शहरासाठी शहर उपप्रमुख व शहर विभाग प्रमुख यांची तालुका प्रमुख विशाल किन्हेकर व मारेगाव शहर प्रमुख विजय मेश्राम यांच्या सान्निध्यात निवड करण्यात आली असून प्रविण साईबाबा बोबडे यांची १ ते ९ प्रभाग क्रमांक साठी उपशहर प्रमुख तर गणपत चोखाजी वाढई यांची १० ते १७ प्रभाग क्रमांक साठी मारेगाव उपशहरप्रमुख पदी निवड करण्यात आली असून विभाग प्रमुख म्हणून १,२,३,४ या प्रभाग करिता मोहन दौलत किन्हेकार ५,६,७,८ या प्रभाग क्रमांक करिता विठ्ठल नानाजी गेडाम प्रभाग क्रमांक९,१०,११,१२ करिता उमेश उत्तम उलमाले व १३,१४,१५,१६ व १७ प्रभाग क्रमांक करिता आनंद पद्माकर नक्षणे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडी शहरात किंवा बुथ वर पक्ष संघटन वाढविण्यासाठी करण्यात आली असून यांचा पदाचा काळ हा एक वर्षासाठी असून यांच्या कार्यकाळातील कार्य पाहून पक्षश्रेष्ठी पुढील पदोन्नतीसाठी विचार करणार आहे.

“ऑपरेशन प्रस्थान” उपक्रमाचे मुख्यमंत्र्याकडून कौतुक

यवतमाळ : जिल्हा पोलीस विभागाकडून ऑपेरेशन प्रस्थान हा कार्यक्रम राबविला गेला. यामध्ये महिला सक्षमीकरण, आत्मसुरक्षा कारणास्तव महिलांना कराटे प्रशिक्षण, आदर्श दुर्गा उत्सव स्पर्धा राबविण्यात आल्या.

त्याचे सादरीकरण प्रत्यक्ष पाहिल्या नंतर मुख्यमंत्र्यांनी यवतमाळ पोलिसांचे कौतुक केले सोबतच अतिवृष्टीने ओढवलेली पूर परिस्थिती ज्यामध्ये राज्यासह जिल्ह्यात शेतकऱ्यांची झालेली पीक नासाडी, घरादाराचे, नुकसान यामुळे उध्वस्थ झालेले कुटुंब यानुसार सामाजिक बांधिलकी जपत त्यांना मदत करणेकरिता.

यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता यांनी पोलीस विभागात कार्यरत पोलिस अधिकारी, पोलीस अंमलदार यांना ता. 27/09/25 ला पोलिस निधी गोळा करणे करिता आव्हाण केले व अवघ्या 24 तासात यवतमाळ जिल्हा पोलीस विभागाने 27, 11,111 रु.सत्तावीस लाख अकरा हजार एकशे अकरा रु.जमा केले व पूरग्रसतांच्या मदतीला हातभार लावत मुख्यमंत्री सहाय्यता निधी म्हणून 27,11,111 रु चा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कडे सुपूर्द केला.

घुग्गुस हायवे ब्राह्मणी फाट्याजवळ अज्ञात इसमाचा मृतदेह आढळला

वणी : दि. 29 सप्टेंबर सोमवार दुपारी 2 वाजेच्या सुमारास ब्राह्मणी फाटा घुगुस हायवे लगत शिव मंदिराच्या मागे एका अज्ञात इसमाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. घटना अंदाजे चार-पाच दिवस आधी झाल्याचे कळते,

पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून शव उत्तरीय तपासणीसाठी वणी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले असून मृत्यूचे नेमके कारण हत्या की आत्महत्या अजून कळले नाही. शव उत्तरीय तपासणीनंतर स्पष्ट होईल या प्रकरणाचा अधिक तपास वणी चे ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

भगवंताला आवडणाऱ्या कार्याचा सेट-अप बिघडला की माणूस अप-सेट होतो. ह.भ.प. श्रेयस बडवे महाराज

वणी: वणी येथील जगद आई म्हणजे जैताई मंदिरात परंपरेनुसार सुरु असलेल्या चार दिवशीय कीर्तन सेवेपैकी तिसऱ्या दिवशी ते, “हेची थोर भक्ती आवडते देवा | संकल्पावी माया संसाराची || या संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या अभंगावर निरूपण करीत होते.

आपले प्रत्येक कार्य करतांना मी जे करीत आहे ते भगवंताला आवडायला हवे, असं नव्हे. खरे तर जे भगवंताला आवडते तेच कार्य मी करायला हवे. भगवंताला आवडणाऱ्या कार्याचा सेट-अप बिघडला तर माणूस अप-सेट होतो.म्हणून मानवाच्या हातून भगवंताला आवडणारेच कार्य घडायला पाहिजे. संतांनी मानवाला उपदेश करताना कधीही कंटाळा केला नाही. उलट त्याचा उद्धार होईपर्यंत त्याचा पाठपुरावा केला, कारण समोरच्या जीवाची माया दूर करणे हेच त्यांचे कार्य होते आणि अशी माया सुटणे यालाच थोर भक्ती म्हणतात.” असे विचार पुणे येथील सुप्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. श्रेयस महाराज बडवे यांनी व्यक्त केले.

      

माधव सरपटवार यांच्यावरील “माझे जीवन गाणे” पुस्तकाचे प्रकाशन

वणी:सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा श्री जैताई मंदिर नगर, वाचनालयाचे अध्यक्ष माधवरावसरपटवार ह्यांना सन २०२५चा जैताई मातृगौरव पुरस्कार प्राप्त झाला. याच सोहळ्यात यांच्यावरील“माझे जीवनगाणे” ह्या पुस्तकाचेथाटात  प्रकाशन झाले. दैनिक तरुण भारतचेमुख्य संपादक शैलेस पांडे, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, ख्यातनाम बांधकामव्यावसायिक आशुतोष शेवाळकर, माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, नागपूर येथील प्रसिद्धडॉ. सौरभ बरडे, विद्यावाचस्पती स्वानंद पुंड, पुस्तकाचे संपादक सुनील इंदुवामनठाकरे आणि सामाजिक कार्यकर्ते विजय चोरडिया प्रामुख्याने उपस्थित होते.     

या पुस्तकाला ख्यातनाम साहित्यिक तथा पत्रकार शैलेश पांडे ह्यांची प्रस्तावना आहे. त्यांनी त्यावर भाष्य केले. संपादक सुनील इंदुवामन ठाकरे ह्यांनी या पुस्तकाची निर्मितीप्रक्रिया विषद केली. ही शैलेश सरपटवार, शर्वरी सरपटवार, राम बीडकर आणि शिल्पा बीडकर ह्यांची निर्मिती असूनप्रकाशक विदर्भ साहित्य संघ, वणी शाखा आहे. मुखपृष्ठ सागर मुने ह्यांचं तर मलपृष्ठ गुरुदत्त बीडकर ह्यांचं आहे. आतील पेन्सील रेखाटन हर्षदा सरपटवार ह्यांचं आहे.मांडणी व सजावट मंगला बक्षी ह्यांची असून निर्मिती प्रमुख भारती सरपटवार आहेत.

प्राचार्यराम शेवाळकर, संजय इंदुरकर, ग्यानचंद भंडारी, अरुणकुमार खैरे, डॉ. श्रीकांतगोडबोले, कोल्हापुरचे राम देशपांडे आदींचे यात लेख आहेत. तसेच महाकवी सुधाकर गायधनी, वनराईचे गिरीश गांधी, प्राचार्य शिरीषदादा कवडे, ना. गो. थुटे, मधुकर सवरंगपते, आशुतोष अडोणी, ब. ना. एकबोटे, वीणा हरदास, प्रा. प्रणिता भाकरे, विनयकोंडावार,  प्रा. रवींद्र साधू, ना. ना.देशपांडे, नरसिंह बेलसरे, दादा घाटोड, नारायण जोशी, डॉ. लक्ष्मण जिवने, केशवआवारी, मीनाक्षी गोरंटिवार आदिंच्या पत्रव्यवहारांचा यात समावेश आहे.

डाखरे गुरुजी, गरुदत्त आणि देवदत्त बिडकर,  सोबतच गौतम सुत्रावे, नीलकृष्ण देशपांडे, स्मिता गोरंटिवार,जया मीनल अनिल रोहणकर, सुभाष व सुनीता देशमुख आदींनी काव्यांतून भावना व्यक्तकेल्या आहेत. कार्यक्रम संयोजन सागर मुने ह्यांनी केलं. यावेळी बहुसंख्यस्नेही, रसिक उपस्थित होते. प्रास्ताविक भूमिका प्रा.स्वानंद पुंड यांनी मांडली.आभार प्रा. चंद्रकांत अणे ह्यांनी मानलेत.

०००००००००००००००००००

न्यू युवा महिला दुर्गा उत्सव मंडळ वणी तर्फे गोंधळा चा कार्यक्रम संपन्न

वणी :न्यू युवा महिला दुर्गा उत्सव मंडळ बँक कॉलनी येथे ता.27/09/25 ला गोंधळाचा कार्यक्रम घेण्यात आला.हिंगणघाट येथील रवि मोरणकर हे कार्यक्रमाचे आकर्षक ठरले. ते आई तुळजा भवानी चे मोठे भक्त असून त्यांनी वणी मध्ये येऊन कार्यक्रम संपन्न केला आहे व सोबतच रांगोळी स्पर्धेचे पण आयोजन केले गेले. मांडलाच्या अध्यक्षा सौ कुंदा मोरेश्वर सावसाकडे,उपाध्यक्षा सौ लता पाटणकर,सचिव सौ अमृता संदीप चट्टे यांचे पुढाकाराने कार्यक्रम यशवी झाला. त्या बद्धल त्यांनी सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले.

भव्य आरक्षण बचाव आक्रोश मोर्चा २९ सप्टेंबरला वणी शहरात

वणी: महाराष्ट्रात वारंवार आदिवासी आरक्षणावर घुसखोरीचे प्रयत्न होत असल्याने मूळ आदिवासी समाजामध्ये तीव्र नाराजी आहे. सध्या बंजारा व धनगर समाज हैदराबाद गॅजेटचा दाखला देत आदिवासी समाजात समाविष्ट करण्याची मागणी करीत असून शासनावर दबाव आणण्यासाठी ठिकठिकाणी मोर्चे आंदोलन सुरू आहेत.

मात्र, बंजारा व धनगर समाज हे आदिवासी नसून त्यांना स्वतंत्र आरक्षणाचा लाभ आधीपासून दिलेला आहे. तरीदेखील आदिवासींमध्ये समाविष्ट करून आरक्षण मिळविण्याची मागणी हा भारतीय संविधानाचा भंग करणारा व संविधानाबाह्य निर्णय ठरेल, असा इशारा आदिवासी संघटनांनी दिला आहे.

आधीच सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकीय दृष्ट्या कमकुवत असलेल्या आदिवासी समाजाचे हक्क हिरावले जाणार असल्याने आदिवासी हक्क व आरक्षण बचाव कृती समिती वणी, झरी, मारेगाव तसेच विविध आदिवासी संघटनांच्या नेतृत्वाखाली २९ सप्टेंबर २०२५ रोजी सोमवारला दुपारी १२ वाजता वणी शहरात भव्य आरक्षण बचाव आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या अस्तित्वाचे आणि हक्काचे रक्षण करण्यासाठी आदिवासी समाजाने एकत्र यावे, असे आवाहन आयोजक समितीने केले आहे.

रास गरबा मधून माँ अंबेची आराधना

जनहित कल्याण महिला संघटनेच्या गरबा उत्साहात रंगत;

मारेगाव :नवरात्रोत्सवा च्या पावन पर्वावर जनहित कल्याण समितीचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर खुराणा यांच्या सौजन्याने जनहित कल्याण महिला संघटनेतर्फे नगरपंचायत प्रांगणात शिवगर्जना दुर्गोत्सव मंडळा देवीसमोर भव्य रास गरबा उत्सवाचे आयोजन करण्यात आले. महिलांनी गरब्याच्या तालावर नृत्य सादर करत माँ अंबेची भक्तीमय आराधना केली.

नवरात्र उत्सव म्हणजे स्त्री सत्ताक संस्कृतीचा उत्सव. याच भावनेतून मारेगावमध्ये आयोजित या उत्सवात महिलांचा व लहान मुलींचा उत्साह पाहण्यासारखा होता. चार गटांमध्ये घेण्यात आलेल्या या गरबा स्पर्धेत सहभागींसाठी आकर्षक बक्षिसांची रेलचेल ठेवण्यात आली आहे. त्यात इलेक्ट्रिक स्कुटी, एलईडी टीव्ही, वॉशिंग मशीन, लॅपटॉप, अँड्रॉइड मोबाईल, बायसिकल अशा मोठ्या बक्षिसांसोबतच सिल्वर कॉइन, पैठणी साडी, हेडफोन आणि लहान मुलींसाठी विशेष गिफ्ट्स चा समावेश आहे.

या बक्षिसांमुळे महिलांचा व मुलींचा उत्साह आणखी उंचावला असून, मोठ्या संख्येने त्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदवून देवीचा गजर करत उत्सवाला रंगत आणली.
गरबा प्रशिक्षक विकास यांनी महिलांना शिस्तबद्ध पद्धतीने गरब्याचे प्रशिक्षण दिले. त्यांच्या मेहनतीमुळे सादरीकरणाला विशेष उठाव मिळाला. दरम्यान, सतत कोसळणाऱ्या पावसाच्या पार्श्वभूमीवरदेखील महिलांचा उत्साह द्विगुणित झाला होता. शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमादरम्यान पावसाने थोडी विश्रांती दिल्याने उत्सव निर्विघ्न व भव्यदिव्य पार पडला.

नगरपंचायत प्रांगणात भरलेल्या या रास गरबा उत्सवामुळे नवरात्रोत्सवाचे पर्व भक्तिमय, उत्साही आणि आनंददायी वातावरणात साजरे झाले.

शाळेच्या पाडल्याची खोट्या तक्रार कर्त्यांची पोलखोल

वणी : सविस्तर खुलासा……………या तीन वर्गखोल्या निर्लेखन करण्याची मंजुरात 1)मा.शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद यवतमाळ यांचे पत्र क्रमांक /यजीप/शिवी/प्राथ/वशि/2120/2025 दिनांक 18/07/2025 ला या आदेशानुसार दिली आहे.
2.) तसेच मा.गटविकास अधिकारी,पंचायत समिती वणी यांनी पसव/वि अ(सां)/निर्लेखन/बानी/272/2025 दिनांक 30/07/2025 या आदेशानुसार वर्गखोल्या निर्लेखन करण्याचा आदेश सरपंच व सचिव ग्राम पंचायत यांना दिला आहे.
3)मा.ग्रामपंचायत विरकुंड यांनी मासिक सभेत वर्गखोल्या पाडण्याचा ठराव मंजूर केला.ठराव क्रमांक 7 सभा दिनांक 29/8/2025
4)मा.शाळा व्यवस्थापन समिती, नवेगाव विरकुंड यांनी सुद्धा मासिक सभेत 3 वर्गखोल्या नियमानुसार पाडण्याचा ठराव घेतलेला आहे.
5) मा.सरपंच व सचिव ,ग्रामपंचायत विरकुंड यांनी 3 वर्गखोल्या नियमानुसार पाडण्याचे काम श्री.पियुष चव्हाण यांना दिले.
6) वर्गखोल्या पाडल्या नंतर मा.सरपंच व सचिव ,ग्रामपंचायत विरकुंड यांनी वर्गखोल्या नियमानुसार पाडल्या असल्याचे माहिती चे पत्र मा.गटविकास अधिकारी,वणी यांना दिले.

दिनांक 22/9/2025 ला .शासन नियमाचे अधीन राहून वरील प्रमाणे पूर्ण प्रक्रिया पार पाडूनच नियमानुसार शाळेच्या 3 वर्गखोल्या निर्लेखीत (पाडल्या) आहेत.यात कोठेही हयगय झालेली नाही. मागील 2 ते 3 वर्षांपासून या जीर्ण वर्गखोल्या पाडण्याचे ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समिती कडून नियमानुसार प्रस्ताव पंचायत समिती मार्फत जिल्हा परिषद कडे गेले होते त्या नुसारच नियमानुसार वरील सर्व प्रक्रिया झालेली आहे.आपल्या शाळेच्या जुन्या जीर्ण वर्गखोल्या झाल्या होत्या, त्यात भिंती मध्ये भेगा पडल्या होत्या , त्यात अनेकदा साप व इतर कीटक निघत होते तसेच या खोल्या धोकादायक झाल्या होत्या , त्यामुळे मुलांना बसण्यास या खोल्या धोकादायक होत्या त्यामुळे इतर गावात जश्या छान नवीन शाळेच्या खोल्या बांधकाम होत आहे तसे आपल्याही शाळेत व्हावे म्हणून आपल्या शाळेतील उत्साही शिक्षक श्री.देवेंद्र बच्चेवार सर यांनी स्वतः च्या खर्चाने अनेक चकरा यवतमाळ ला मारून सर्व अधिकारी यांना भेटून या वर्गखोल्या पाडण्याचे प्रस्ताव मंजूर करून आणले.

त्यानंतर ग्रामपंचायत व शाळा व्यवस्थापन समिती च्या पुढाकारात नियमानुसार या 3 वर्गखोल्या पाडण्यात आल्यात.या वर्गखोल्या पाडण्याचे खर्चाचे इस्टीमेट पंचायत समिती कार्यालयात उपलब्ध आहे.वर्गखोल्या पाडण्याकरिता शासनाकडून कोणताही आर्थिक निधी मिळत नसतो.तर तो खर्च या वर्गखोल्याचे निघणारे सामान विकून भागवायचा असतो त्यात रक्कम कमी पडल्यास ग्रामपंचायत नी उर्वरित रक्कम भरपाई करून द्यायची असते व या सर्व सामानाची विल्हेवाट ही नियमानुसार लावण्याचे अधिकार ग्रामपंचायत ला आहे.

हे सर्व शासन नियम आहेत.त्यानुसार इस्टीमेट पेक्षा जास्त खर्च पाडण्यासाठी लागणार होता त्यामुळे इस्टीमेट आहे तेवढया खर्चातच या वर्गखोल्या पाडाव्यात व त्या बदल्यात टिन पत्रे, लोखंडी सामान , लाकडी सामान व इतर मटेरियल ठेकेदाराला देण्याचे करारानुसार ग्रामपंचायत ने ठरवले होते.जास्तीचे एकही पैसे ठेकेदाराला दिले नाहीत. वर्गखोल्या च्या निघालेल्या समानातच हे सर्व काम श्री.पियुष चव्हाण ठेकेदार यांचे कडून करून ग्रामपंचायत ने करून घेतले. आताही शाळेत पडून असलेल्या मटेरियल ची मालकी ठेकेदार यांची आहे. या सर्व कामात शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांचा काहीच सहभाग नसून हे सर्व काम करण्याचा अधिकार मा.गटविकास अधिकारी यांनी ग्रामपंचायत ला दिल्याने ग्रामपंचायत ने नियमानुसार सर्व कार्यवाही पूर्ण केली.

तरीपण कोणत्याही प्रकारची पूर्ण माहिती न घेता गावातील काही लोकांनी या कामा बाबत निरर्थक आक्षेप घेऊन शाळेमध्ये जाऊन विनाकारण काहीही चूक नसताना तेथील मुख्याध्यापक व शिक्षकांना त्रास दिला.ही बाब अत्यंत निंदनीय आहे.तसेच याच काही गावातील लोकांनी मा.गटविकास अधिकारी वणी यांचे कडे तक्रार नेली असता गटविकास अधिकारी साहेबानी वरील सर्व कामे ही नियमानुसार झाली आहे असे ठणकावून सांगितले. त्यामुळे विनाकारण ग्रामपंचायत व शाळेला बदनाम करण्याचा काही लोकांचा मानस असून ते आपल्या स्वतःचे अस्तित्व दाखवण्याचा गैर हेतूने नाहक गावाची बदनामी करत आहेत. तरी सर्व ग्रामस्थांनी हा खुलासा वाचून व या सोबत असलेले सर्व आदेश पाहून खात्री करावी व गावाची बदनामी करणाऱ्यांचे षडयंत्र हाणून पाडावे.
नवीन वर्गखोल्या मंजूर करून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे.अशी मी सर्व नागरिकांना विनंती करतो

बोर्डा गावात देशी दारूचा महापूर

वणी वरून बोर्ड हे गाव 20 किमी अंतरावर आहे लगेचच बोर्डा गावाला लागून विकुली ची मोठी खदान आहे. मुळात घोंसा गाव असून तिथं दारूचे शासकीय दुकान आहे तिथून बोर्डा ह्या गावात दोन अंकी संख्येने देशी विदेशी दारू सर्रास दळणवळण होते गावात देशी दारूचे कोणतेही परवाना नसताना काही गुंड पूर्तीचे टपुरे भामट्यांनी मोठ्या प्रमाणावर देशी विदेशी दारूचे दुकान आपल्या राहत्या घरी मोठ्या प्रमाणावर थाटले आहे.

परंतु अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने बोर्डा गावातील देशी विदेशी दारूचे दुकानदार सर्रास चालू असून गावातील महिला व शाळकरी मुलींना रस्त्याने येणे जाण्याकरिता प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे आहे. दोन दिवसा पूर्वी काही गाव गुंड यांनी चपटी ढोपसून रस्त्याने येत असलेल्या एका इसमाला जाणून बुजून पकडून लाता बुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

सदर इसम हा वीरकुंड नवेगाव गावाचा असून त्याची तब्येत अतिशय गंभीर स्वरूपाची आहे असे कळले असून याला आळा घालण्यासाठी जिल्ह्यातील माननीय जिल्हा पोलीस अध्यक्ष साहेब यांनी त्वरित लक्ष देऊन बोर्डा गावातील देशी-विदेशी दारूचे अवैध्य दुकान थाटलेल्या लोकांवर कडक कारवाई करून दुकान त्वरित बंद करावी अशी मागणी गावातील महिला व नागरिकांची असून बंदन झाल्यास आंदोलन करण्याच्या इशारा दिला आहे.