नगरपरिषद पहिल्या विकासकामाची सुरुवात टागोर चौकातील ट्यूबवेल “

वणी : 24 डिसेंबरला प्रभाग क्रमांक १०/११, वणी येथील टागोर चौकातील नगरपरिषदेच्या ट्यूबवेल कामाचे नारळ फोडून शुभारंभ करण्यात आला. नगरपरिषद निवडणुकीनंतरचे पहिल्या विकासकामाची सुरुवात व भूमिपूजनाचा अभिमानाचा क्षण जनतेचा साक्षीने उत्सहात पारपडला. जनतेने भाजपावर केलेल्या विश्वासाला भाजप कटिबद्ध असून निवडणुकीतील प्रत्येक शब्द प्रत्यक्ष कृतीत उतरवून पाणीपुरवठा, मूलभूत सुविधा आणि दर्जेदार विकासाला गती देण्यास भाजप कटिबद्ध राहील . ही केवळ सुरुवात असून वणीचा विकास हेच आमचे स्वप्न.

यावेळी माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुलवार, नवनिर्वाचित नगराध्यक्ष विद्याताई आत्राम, भाजपा शहराध्यक्ष अॅड. निलेश चौधरी, प्रभाग १०/११ चे नगरसेवक व मनोज सरमुकदम, भाजपा कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वैभव कोटेक्स जिनिंग प्रेसिंग ऑइल मिलमध्ये मोटर व भंगार चोरी

वणी: तालुक्यातील निळापूर रोड वरील वैभव कोटेक्स प्रा. लिमिटेड जिनिंग प्रेसिंग व ऑइल मिल फॅक्टरी मधील 5HP च्या मोटरी व भंगार 16 डिसेंबर ला चोरी झाल्याचे आढळून आले.

सविस्तर माहितीनुसार निळापूर रोड वरील वैभव कोटेक्स प्रा. लिमिटेड जिनिंग प्रेसिंग व ऑइल मिल फॅक्टरी येथील काम करणारा संदीप संतोष धांडे वय 32 रा. चिखलगाव ता. वणी याने कंपनीतील क्रॉम्पटन ग्रेवीस कंपनीच्या 5 HP च्या 13 मोटरी एकूण 39,000 रू. किमतीच्या व भंगार व काही स्पेअरपार्ट चोरी करून घेहून गेला अशा स्वप्नील सुनील भंडारी वय 37 रा. वणी यांचा फीर्यादी वरून 16 डिसेंबर 025 ला संदीप संतोष धांदे विरुद्ध अप क्र. 755/25 कलम 306 भा.न्या.स.नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वणी पोलीस करीत आहे.

स्थानिक गुन्हे शाखा व पो. स्टेशन पुसद ग्रामीनचा गांजा तस्करीवर छापा 7,71,600चा मुद्देमाल जप्त “

वणी: जि्हयात पो.स्ट. कळंब व पुसद प्रामीण ह्ीत अंमली पदार्य- (गांजा )संबथाने केलेल्या दोन वेगवेगळया कारवाईत स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ व पोलीस स्टेशन पुसद ग्रा. यांनी एकृण 05 आरोपी ताब्यात घेबुन त्यांचेकडुन 10 किलो पेक्षा जास्त गांजा व इतर साहित्य असा एकुण 7,71,600/- रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.

सविस्तर माहिती नुसार स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ व पोलीस स्टेशन पुसद ग्रा. यांनी कारवाई दिनांक 14डिसेंबर025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यवतमाळ येथे हजर असतांना पथकास गोपनीय माहिती मिळाली की, सैयद राहत अली उर्फ टकल्या सेयद अमजत अली रा. यवतमाळ हा त्याचे साथीदारासह रात्री सुमारास चारचाकी वाहनातुन नागपुर वरुन कळंब मार्गे यवतमाळ येथे गांजा नावाचा अंमली पदार्थ विक्री करण्याचे दृष्टीने घेवुन येणार आहे.

अशा माहिती वरुन पथकाने माहिती बाबत वरिष्ठ्ांना कल्पना देवुन छापा कारवाईची कायदेशीर पुर्तता करुन नागपुर कळब यवतमाळ रस्त्यावरील नरसापुर बसस्टॉफ चे समोर सापळा लावून थांबले असतांना रात्री 11 वा. सुमारास माहिती प्रमाणे निळया रंगाचे स्विफ्ट कंपनीचे चारचाकी वाहन क्रमांक एम. एच. बी. एफ 8029 हे येतांना दिसल्याने वाहनास पो.स्टाफ चे मदतीने थांबवून वाहनातील इसमांना नंव पता विचारला असता 1) श्रवन हरिदास फुलमाळी वय 27 (चालक) 2) प्रितमसिंग दामोथर रामटेके वय 40 दोन्ही रा. आशोक नगर यवतमाळ, 3) सैयद राहत अली उर्फ टकल्या सैयद अमजत अली वय 54 रा. सराना ले आउट यवतमाळ असे सांगीतले.

त्यानंतर पंचासमक्ष वाहनाची झड़ती घेतली असता त्यामध्ये इसम सैयद राहत अली याचे मांडीवर असलेल्या लालरंगाचे बँग मध्ये 8.030 किग्रेम कि. अ. 1,60,600 रु चा गांजा मिळुन आल्याने सदरचा गांजा तसचे आरोपीच्या ताब्यातील तिन मोबाईल, चारचाकी वाहन व इतर साहित्य असा एकुण 6,91,600 रु चा मुद्देमाल जप्त करुन आरोपी विरुध्द पो.स्टेशन कळंब येथे एन.डी.पी.एस. कायदयान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन आरोपी व मुद्देमाल पुढील कार्यवाहीसाठी पो.स्टे.कळंब यांचे ताब्यात देण्यात आला आहे.

तसेच दिनांक 14डिसेम्बर025 रोजी पोलीस ठाणे पुसद ग्रामीण येथील पोलीसअधिकारी यांना दंगल नियंत्रन पथकातील अंमलदार यांचेकड्न गुप्त मिळाली की, रात्री सुमारास दोन इसम मोटर सायकलने पुसद कडुन दिग्रसकडे गांजा अंमली पदार्थ अवैर्धरित्या वाहतुक करुन घेवुन जाणार आहेत अशा माहिती वरुन कायदेशीर बारबींची पुर्तता करुन पुसद ग्रामीण पोलीस ठाणे येथील अधिकारी अंमलदार यांनी सायंकाळी 7/30 वा सुमारास दिग्रस पुसद मार्गावरील ग्राम धुंदी परिसरात सापळा रचला.

माहिती प्रमाणे दुचाकी वाहन येतांना दिसल्याने त्यास थांबवुन त्यांची नावे विचारली असता 1) शेख इसराईल उर्फ शेख वसीम शेख ईस्माईल वय 32 रा. संभाजी नगर दिग्रस, 2) एजाज निजाम नौरंगाबादे वय 32 रा. गवळीपुरा दिग्रस अशी सांगीतल्याने पंचासमक्षङ डती घेतली असता त्यांचे मोटर सायकलवरील नायलोन पिशवीत 2.041 किग्रेम गांजा कि.अ. 50,000 रु चा मिकन आल्याने सदर गांजा व वाहन असा एकुण 80,000/- किमंतीचा मुद्देमाल जप्त करुन आरोपी विरुध्द पो.स्टेशन पुसद ग्रामीण येथे एन.डी. पी. एस. कायदयान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

हि कारवाई पोलीस अधीक्षक, यवतमाळ कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उप. वि. पो. अ. हनुमंत गायकवाड उमरखेड, पुसद प्रभार यांचे मार्गदर्शनात पो. नि. सतिश चवरे, मनिष गावंडे, पोउपनि गजानन राजमल्लू, पोलीस अंमलदार सै. साजीद, योगेश गटलेवार, अजय डोळे, रुपेश पाली, योगेश डगबार, प्रशांत हेडाऊ, रितुराज मेढवे, सुनिल पैठणे, आकाश सहारे, देवेद्रं होले, आकाश सुर्यवंशी सर्व स्था. गु. शा.यवतमाळ तसेच पोलीस स्टेशन पुसद ग्रामीण येथील टाणेदार स.पो.नि. सुरेंद्र राऊत, पोउपनि राहल देशमुख, श्रेणी पोउपनि कैलास ससाणे, पोलीस अंमलदार रविंद्र गावंडे, तसेच आरसिपी पथकातील पोलीस अंमलदार आभिजीत सांगळे, संतोष सरकूंडे, अविनाश कदम, सुनिल चिरमाड़े यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

LCB. ची दमदार कारवाई”30 लाखाच्या मुद्देमालासह 65 गोवंशाची सुखरूप सुटका ‘

वणी :15 डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत असता गुप्त माहितीवरून नागपूर वरून हैदराबाद हायवेने अवैधरित्या गोवंश जनावरांची वाहतूक करीत असल्याचे माहितीवरून दोन ट्रक सह एकूण 30 लाख रू. मुद्देमाल जप्त केला असून 65 बैलाची सुखरूप सुटका केली.

सविस्तर माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पांढरकवडा उपविभागात अवैध धंदे विरुद्ध कारवाईदरम्यान पेट्रोलिंग करीत असता गुप्त माहितीच्या आधारे नागपूर वरून हैदराबादकडे गोवंश जनावराची वाहतूक होत असल्याचे माहिती मिळताच ताबडतोब सिंधोडा गावाजवळ सापळा रचला असता पथकाला समजले की सदरचे ट्रक भारत पेट्रोल पंपा जवळील खाली जागेत जय बजरंग बली राजस्थानी धाब्याजवळ असलेल्या पार्किंग मध्ये लपवून असल्याचे निदर्शनास आले.

त्या ठिकाणावरून ट्रक क्रमांक 40 वाय 0951 व एम. पी.04 एच ई 3515 यांची तपासणी केली असता त्या वाहनामध्ये क्ररतेने 65 जिवंत बैल व एक मृत गोरा असे एकूण 66 जनावरे आढळून आले. कोणताही चारापाणी व्यवस्था न करता असुरक्षित क्रूरतेने कोंडून आणल्याचे दिसून आले.

ड्रायव्हर व त्याचे सोबती 1) शेख शहनाज शेख महबूब वय 31 रा. यशोधरा नगर शारदा चौक नागपूर 2) शेख अरबाज शेख कलीम वय 25 रा. भाजी मंडी नागपूर 3) मो. नसरुद्दीन दूरशाहीन कुरेशी वय 28 रा. मदन चौक कामठी नागपूर 4) मो. हसन रोशन अन्सारी वय 26 रा. बनते आनंद कौशल नगर पिली नदी नागपूर, सदर ड्रायव्हरला विचारणा केली असता हा माल 5) वकार कुरेशी रा. कामठी नागपूर याचा असल्याचे सांगितले 66 गोवंशासह दोन ट्रक असा 30 लाख रू. मुद्देमाल जप्त करून यांचे विरुद्ध वडकी पोलीस ठाणे येथे प्राणी निर्दयतेने वागवणे अधि. व प्राणी संरक्षणअधि. व भान्यासं चे विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास वडकी पोलीस करीत आहे.

हि कार्यवाही पो. अधीक्षक कुमार चिंता यवतमाळ, अपो. अधीक्षक अशोक थोरात, यांच्या मार्गदर्शनात पोनि. सतीश चौरे, सपोनि. दत्ता पेंडकर, पोउनीं. धनराज हाके, पो. अमलदार सुनील खंडागळे, सुधीर पांडे, निलेश निमकर, सुधीर पिदुळकर, रजनीकांत मडावी, सलमान शेख यांनी यशस्वी पार पाडली.

गोवंश कत्तल व मास विक्रीवर वणी पोलिसांची धाड “

वणी : शहरात मोमिनपुरा भागात अवैध गोवंश कत्तल करून मास विक्री होत असल्याचे गुप्त माहितीवरून 14 डिसेंबर 025 ला वणी पोलिसांनी टाकलेल्या यशस्वी धाडीत 33 हजाराहून अधिक किमतीच्या 80 किलो गोवंश मास व कत्तलीसाठी वापरले जाणारे साहित्यसह दोन आरोपींना अटक केली आहे.

सविस्तर माहितीनुसार आणि पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांनी मिळालेल्या गुप्त माहितीवरून मोमीनपुरा भागात मोहम्मद एजाज अब्दुल अजीज कुरेशी याच्या घरी अवैध गोमास कत्तल करून विक्री करीत असल्याचे माहितीवरून सहा.पो. निरीक्षक निलेश अपसुंदे यांच्या विशेष टीमने मोमीनपुरा येथे मोहम्मद एजाज अब्दुल अजीज कुरेशी याच्या घरी यशस्वी धाड टाकण्यात आली तेथे गोवंश मास विक्री करत असल्याचे आढळून आले.

घटनास्थळावरून गोवंश मास 70 ते 80 किलो अंदाजे किंमत 16000 हजार रू., लोखंडी धारदार सत्तुर चार नग, लोखंडी वजन काटे वजनाची मापे दोन नग, गोवंश मास बारीक करण्याचे जुने इलेक्ट्रिक मशीन ( खिमा मशीन), प्लॅस्टिक कॅरीबॅग असा एकूण 33,060 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पशुवैद्यकीय अधिकारी यांनी गोवंश मासाचे 5 नमुने रासायनिक तपासणीसाठी घेतले असून मुख्याधिकारी वणी यांच्याशी पत्र व्यवहार करून गोवंश मास नाशवंत असल्याने पंचायत समक्ष त्याचा नाश करण्यात येईल.

यातील आरोपी 1) मोहम्मद एजाज अब्दुल अजीज कुरेशी व 2) मोहम्मद कैसर मोहम्मद अजीज कुरेशी दोन्ही मोमीनपुरा वणी यांच्या विरोधात महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम 1976 कलम 5,5 (क ), 9,9 (अ 2 ) सह भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 3 (5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी वणी यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांच्या आदेशाने सहा.पो. निरीक्षक निलेश अपसुंदे,पो. उप. निरीक्षक धीरज गुल्हाने, पो. हवा. बारसागरे, ना. पो. का. विशाल राठोड, पो. का. श्याम घुगे, नंदकुमार पप्पुलवार, गणेश मेश्राम, म. पो. का. पल्लवी बल्की चालक अरविंद यांनी यशस्वी पार पाडली.

सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा जपण्याची गरज – राजू निमसटकर




जयंती उत्सव सोहळ्याची सुरुवात बुद्ध वंदनेने करण्यात आली. यावेळी बोधाचार्य अमरनाथ तेलतुंबडे, बोधाचार्य गौतम मालखेडे यांचेसह वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू निमसटकर, तात्याजी पाटील चिकाटे, अनिल खैरे, रवी तेलंग आणि अनंता खाडे यांचेसह समस्त उपस्थितांनी भैय्यासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन केले.

वंचित बहुजन आघाडीचे वणी विधानसभा प्रमुख राजू निमसटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या सूर्यपुत्र यशवंत उर्फ भैय्यासाहेब आंबेडकरांच्या जयंती उत्सव सोहळ्यात, भैय्यासाहेबांच्या जीवनकार्यावर प्रमुख वक्ते राजू निमसटकर यांनी बौद्ध समाजाची वर्तमान स्थिती, शिक्षणाची आवश्यकता, आणि भविष्यातील धोके यावर मुद्देसूद भाष्य केले. अन्यायाविरुद्धची चीड ही भैय्यासाहेबांची खरी शिकवण असून सामाजिक परिवर्तनासाठी ती अनिवार्य आहे. त्यासाठी शिक्षणाबरोबरच संघटित होणे हे समाजाच्या उन्नतीचे मूलभूत आधार असून बाबासाहेब आणि भैय्यासाहेब यांच्या विचारांचा वसा आणी वारसा जाणत्या तरुण कार्यकर्त्यांनी पुढे नेणे ही काळाची गरज असल्याचे स्पष्ट प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.

राजू निमसटकर पुढे बोलताना म्हणाले, परमपूज्य डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर उद्भवलेल्या खडतर परिस्थितीत सुर्यपूत्र यशवंत उर्फ भैय्यासाहेब आंबेडकरांनी खंबीरपणे चळवळीचे नेतृत्व केले. एकाचवेळी ते विरोधक आणि स्वकियांशी लढत होते. परिणाम स्वरूप सूर्यपुत्र यशवंत उर्फ भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या कार्याने बौद्ध समाजात जागृती, शिक्षणाची ओढ आणि हक्कांसाठीच्या संघर्षाची धग निर्माण झाली. म्हणूनचं भैय्यासाहेब आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा मजबूत पाया निर्माण करण्यासाठी बौद्ध समाजाने संघटित राहणे अत्यंत महत्त्व आहे. अशी ठाम भूमिकाही त्यांनी यावेळी बोलून दाखविली.

यावेळी भैय्यासाहेब आंबेडकरांच्या जीवनकार्यावर बोलताना बोधाचार्य अमरनाथ तेलतुंबळे म्हणाले,
भारतीय बौद्ध महासभेचे कार्य पुढे नेणे असो, ऐतिहासिक चैत्यभूमीचे निर्माण असो वा बाबासाहेबांचे साहित्य प्रकाशन असो इत्यादी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि जबाबदारीचे कार्य सूर्यपुत्र भैय्यासाहेबांनी अनेक प्रकारचे दुःख पचवून, त्याग करून पूर्ण केले. म्हणूनचं आंबेडकरी चळवळ या सूर्यपूत्राची नेहमीच ऋणी राहील, असे स्पष्ट मत तेलतुंबळे यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे संचालन बोधाचार्य गौतम मालखेडे यांनी केले तर बोधाचार्य अमरनाथ तेलतुंबडे यांनी धम्मपठण करून भैय्यासाहेबांचा जीवनपट अधोरेखित केला.
आयोजित जयंती उत्सव सोहळ्यास वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू निमसटकर, बोधाचार्य अमरनाथ तेलतुंबडे, बोधाचार्य गौतम मालखेडे, वंचित बहुजन आघाडीचे मारेगांव तालुका कार्याध्यक्ष अनिल खैरे, मारेगाव शहराध्यक्ष अनंता खाडे, कार्याध्यक्ष रवी तेलंग, महासचिव विनेश मेश्राम, तात्याजी पाटील चिकाटे, बाळू गजभिये, समता सैनिक दलाचे वसुमित्र वनकर, महिला शहराध्यक्षा रेखा काटकर, महासचिव शितलताई तेलंग, मीराताई दुपारे, जयश्री दारुंडे, शामला खैरे, सारिका गवई, दीपा तेलंग, धोपटे काकू, विजय खाडे, प्रानशील पाटील, लक्ष्मीकांत तेलंग, धनराज मुन, पुंडलिक साठे, तारानाथजी तामगाडगे, बाळू टेनपे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बौद्ध समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोहारा पोलीस स्टेशन हद्दीतील गुंड तडीपार

वणी :पोलीस स्टेशन लोहारा हद्दीत राहणारा भावेश उर्फ गोत्तु राजेद्र तिवारी रा. बोदड रोड चौसाळा त्याचेविरुद्ध वेळोवेळी प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आली असताना सुद्धा त्याचे वर्तणुकीमध्ये कोणताही बदल घडुन न आल्याने त्याला तडीपार करण्यात आले.

याचेविरुद्ध पोलीस स्टेशन यवतमाळ शहर येथे अपक्र. 288/2015कलम 324,323,506भा. द. वि. 2) पोलीस स्टेशन लोहारा येथे अपराध क्रमांक 106/2016 कलम 324,336,34 भा.द.वि, 3) अपराध क्रमांक 69/2017 कलम 324,34 भा.द.वि., 4) अपराध क्रमांक 307/2022 कलम 294,506 भा.द.वि., 5) अपराध क्रमांक 14/2025 कलम 333,115(2),324(4),352,351(2),3(5) भा.न्या.सं. प्रमाणे गुन्हे नोंद असुन त्याचेविरुद्ध वेळोवेळी प्रतिचंधक कार्यवाही करण्यात आली असताना सुद्धा त्याचे वर्तणुकीमध्ये कोणताही बदल घडुन आला नाही.

त्याचेवर दिनांक 07/07/2025 रोजी हद्दपारीचा प्रस्ताव सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहीत चौधरी पोलीस स्टेश लोहारा यांनी मा. उपविभागीय दंडाधिकारी यवतमाळ यांचेकडे पाठविला होता. सदर प्रस्ताव वरुन मा. महोदय यांनी चौकशी अंती गुंड नामे भावेश उर्फ गोलू राजेद्र तिवारी वय 30 वर्ष रा. बोधड रोड चौसाळा यास 01 वर्षापर्यंत यवतमाळ जिल्ह्याचे हद्दीमधुन हद्दपार करण्याचे दिनांक 05/12/2025 रोजी आदेश केल्यानेभावेश उर्फ गोत्तु राजेद्र तिवारी यास ताब्यात घेवुन दिनांक 09/12/2025 रोजी हद्दपारीचे आदेश तामील करण्यात आले व यवतमाळ जिल्ह्यातुन हद्दपार करण्यात आले.

यवतमाळ शहरातील बोदड व वाघापुर परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत राहावी याकरीता माननिय पोलीस अधिक्षक कुमार चिंता यांचे आदेशाने तसेच अप्पर पोलीस अधिक्षक अशोक धोरात व उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाने यांचे मार्गदर्शनात ठाणेदार रोहीत चौधरी, पोउपनि गजानन अजमीरे, मपोना रजनी गेडाम, पोहवा अमोल अन्नेरवार, नकुल रोडे, पवन चिरडे, बबलु पठाण, प्रशांत राठोड, रितेश मस्के यांनी कार्यवाही केली.

नॉयलॉन मांजा विकणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

वणी: पोलीस अधीक्षक यांचे ओदशाने महाराष्ट्र मध्ये प्रतिबंधीत नॉयलॉन मांजा विकी करिता आणणाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. त्यावरून माहिती काढली असता पो.स्टे. यवतमाळ शहरतील मारवाडी चौक येथे पंतग विकी चा व्यवसाय करणारा कृष्णकुमार उर्फ बन्टी सिओटीया हा नॉयलॉन मांजा विकत आहे. अशी खात्रीशीर माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेने कार्यवाही केली.

मिळालयाने माहिती वरून त्याचे कडे नायलॉन दोरा मांजा यावर महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेली असतांना देखिल मागील आठवडया पासुन तोनायलॉन दोरा मांजा विक्री करीत आहे. मारवाडी चौक येथील पंतग विकी करणाऱ्या दुकानात गेले असता दुकानात जावून कृष्णकुमार उर्फ बन्टी सिओटीया हा मांजा विकी करताना मिळून आला.

त्या ईसमास आमची व पंचाची ओळख देवुन तेथे येण्याचा उददेश समजावुन सांगीतला त्यानंतर पंचा समक्ष कृष्णकुमार उर्फ बन्टी सिओटीया याच्या दुकानातील पांढऱ्या रंगाच्या पोत्या मध्ये पाहणी केली असता त्या मध्ये नॉयलॉन मांजा 1. गोल्ड नायलॉन मांआ 13 बन्डल प्रती700/रू. प्रमाणे9,100/-रू, 2. नायलॉन मांजा चकरी मध्ये गुडांळलेला 13 चकऱ्या प्रती300/रू. प्रमाणे 3,900रू.या मुद्देमाल एकुण 13,000/- रू.चा मांजा नॉयलॉन दौरा पंचनाम्या प्रमाणे जप्त करून त्यास पुढील कार्यवाही करिता यवतमाळ शहर यांचे ताब्यात देण्यात आले. नागरीकांना आव्हान करण्यात येते की, नॉयलॉन मांजा यवतमाळ जिल्हयात विकी विषयी माहिती प्राप्त झाल्यास पोलीसाना माहिती दयावी.

हि कारवाई मा. पोलीस अधीक्षक यवतामळ, कुमार चिंता , अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपिवभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक सतीश चवरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, यांचे मार्गदर्शनात सपोनि मनिष गावंडे, पोउपनि गजानन राजमलू, सफै/सै. साजीद, योगेश गटलेवार, पोहवा / अजय डोळे, पोहवा रूपेश पाली, पोहवा / योगेश डगवार, पोहवा / रितुराज मेडवे पोहवा/सचिन घुगे, पोकों सुनिल पैठणे, पोकों/देवा होले, पोकों/आकाश सुर्यवंशी स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

ज्ञानसूर्य बाबासाहेबांना आदरांजली शहरात कॅण्डल रॅलीने वेधले लक्ष

वणी: मारेगाव :ज्ञानाचा अथांग महासागर ज्ञानसूर्य भारतरत्न डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शनिवारी सकाळी मारेगाव येथे लीन होवून शेकडोनीं आदरांजली वाहिली. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार परमपूज्यु डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी ६ डिसेंबर रोजी सकाळी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चिमुकल्यासह पालकांनी आदरांजली वाहिली.

यावेळी फुले शाहू आंबेडकरी विचारसरणीला मानणारे पांढरे शुभ्र वस्र परिधान करून बाबासाहेबांना वंदन करीत होते. शेकडोनीं मेणबत्ती, अगरबत्ती प्रज्वलीत करीत माल्यार्पण केले. सामूहिक बुध्द वंदना आणि धम्मराजिका बुध्द विहारात त्रीशरण पंचशीलाचे सामूहिक पठण करण्यात आले.सायंकाळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची शेकडो अनुयायीच्या सहभागात कॅण्डल रॅली शहराच्या विविध मार्गाने मार्गक्रमण करीत ध्वनीक्षेपकाच्या मधुर आवाजात ” बुद्धम.. सरणं.. गच्छामी..! बुद्ध वंदनेने आदरांजली वाहण्यात आली. स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यानजीक मेनबत्ती प्रज्वलीत करीत सामूहिक बुध्द वंदनेने महापरिनिर्वाण दिनाची शेकडोच्या उपस्थितीत सांगता झाली.

कार्यक्रमासाठी उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला. याप्रसंगी मारेगाव नगरपंचायत प्रशासनाचे मुख्याधिकारी शशिकांत बाबर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य, संघर्ष आणि दूरदृष्टीकोनावर शब्दरूपी प्रकाश टाकला.

सोयाबीन पिकाला तातडीने गुणवत्तेनुसार योग्य भाव देण्याबाबत मनसेचे तहसीलदारांना निवेदन “

वणी : सोयाबीन पिकाला तातडीने गुणवत्तेनुसार योग्य भाव देण्याबाबत 03 डिसेम्बर 025 ला मनसे कडून वणी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे यावर्षीच्या सोयाबीन पिकाच्या गंभीर समस्या असून यावर्षी वणी तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त अतिवृष्टी झाल्यामुळे सोयाबीन पिकामध्ये नैसर्गिक बदल झाला आहे, ज्यामुळे शेतातील उभे सोयाबीन पीक काही प्रमाणात काळपट (रंग उतरलेला) झाले आहे.

हया पिकातील बदल नैसर्गिक असून, तो अतिवृष्टी मुळे झाला आहे, यात शेतकऱ्याचा कोणताही दोष नाही. सध्या, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (APMC) तपासणी अधिकारी मालामध्ये जाणीवपूर्वक किरकोळ दोष काढून सोयाबीन पिक अयोग्य ठरवून तो रद्द करत आहेत. परिणामी, शेतकऱ्यांना आपले पिक एकतर परत घरी घेऊन जावे लागत आहे किंवा नाईलाजास्तव खाजगी व्यापाऱ्यांना अत्यंत कवडीमोल भावाने विकावा लागत आहे.

या गंभीर परिस्थितीत, शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान थांबवण्यासाठी, प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा. ज्याप्रमाणे कपासीच्या पिकाला त्याच्या दर्जाप्रमाणे (Quality Grade) दर निश्चित केला जातो, त्याच धर्तीवर यावर्षीच्या सोयाबीन पिकालासुद्धा त्याच्या गुणवत्तेनुसार (उदा. रंग, ओलावा विचारात घेऊन) दर निश्चित करून तो खरेदी करण्यात यावा.आपण शेतकऱ्यांचे झालेले नुकसान आणि त्यांची वर्तमान आर्थिक स्थिती लक्षात घेऊन, या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन शेतकऱ्यांचेआर्थिक नुकसान थांबवावे.

असे मनसे नेते फाल्गुन गोहोकर,प्रमोद कोल्हे, लकी सोमकुवर, प्रवीण कळसकर, नितीन चहाणकर, रवी वनकर, रुपेश पेचे, धीरज भगवा, संतोष गोंडे, धीरज पेचे, आशिष चहाणकर, आशिष ठावरी, सुरज काकडे, प्रशांत शेंडे, अमोल लांबट यांनी दिले.