बालसदन जळका येथून मुलगा बेपत्ता 

              पोलीस स्टेशन मारेगाव अंतर्गत येत असलेल्या जळका येथील बालसदन येथून एक मुलगा बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सदर बाबीची तक्रार पोलीस स्टेशन मारेगाव येथे करण्यात आली आहे.

           रुद्रा आकाश राठोड वय ९ वर्ष रा. खडबडा मोहल्ला, रंगनाथ नगर, वणी,जिल्हा यवतमाळ (ह. मु. आनंद बाल सदन, जळका ) असून  तो दिनांक २२ सप्टेंबर  रोजी सकाळी ६. ४५ वा. बाल सदन गृह येथे हजर होता त्यानंतर कुणाला काहीच न सांगता बाल सदन मधून निघून गेला आहे.अशी तक्रार  मोहन महादेव उईके , काळजीवाहक आनंद बाल सदन जळका यांनी पोलीस स्टेशन मारेगाव येथे दिली आहे.

त्यानुसार  वर्णन – उंची ३ फूट ५  इंच, रंग सावळा असून त्याने पांढरा शर्ट -निळा फुल पॅन्ट परिधान केला असून त्याला मराठी भाषा बोलता येते. अशा वर्णनाचा मुलगा आढळ्यास पोलीस स्टेशन मारेगाव येथे कळविण्यात यावे असे आवाहन पोलिस निरीक्षक श्याम वानखेडे , पोलीस जमादार  किसन सुंकुलवार यांनी केले आहे 

मारेगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करा,

राज्यासह तालुक्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आधीच कर्जमाफी झाली नाही. त्यात शेतातील पीक देखील हातातून गेले आहे. त्यामुळे बळीराजा अडचणीत आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना राज्य सरकारने तातडीने मदत करावी, अशी मागणी काँग्रेसने तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून मागणी केली आहे.

राज्यसह मारेगाव तालुक्यालाही अतिवृष्टीचा मोठा फटका बसला असून सोयाबीन, कापूस या पिकांचे नुकसान झाले आहे. तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी मारेगाव तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून मागणी केली करण्यात आली.

शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम धोक्यात येण्याची शक्यता आहे. बळीराजा आस लावून बसला असून तालुक्यातील शेतकरी निराश झाले आहे. त्यांना तातडीने मदतीची गरज आहे. तालुक्यातील पंचनामे लवकर पूर्ण करून ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदतीची घोषणा करावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी माजी जिल्हा परिषद बालकल्याण सभापती अरूणाताई खंडाळकर, तालुका अध्यक्ष मारोती गौरकार, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गौरीशंकर खुराणा, तुळशीराम कुमरे, अंकुश महापुर, विजय घोटेकर, आकाश बदकी, यादव काळे, माया पेंदोर सह तालुक्यातील काॅग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येमध्ये या उपस्थित होते.

TWJ फ्रँचाईस बिझनेस अग्रीमेंट कंपनीने ग्राहकांची -3 कोटी 31 लाखाची फसवणूक

यवतमाळ : जांब रोड येथील TWJ फ्रँचाईस बिझनेस अग्रीमेंट कंपनीने पैसे गुंतवणीचा बदल्यात अधिक व्याज देण्याच्या प्रलोभनातून गुंतवणूकदारांची फसवणूक केली.3,% ते 4 % दराने दोन तीन महिने सुरळीत व्याज दिले. नंतर ग्राहकांनी व्याज व मुद्दल परत मागितल्यास TWJ कंपनीने उडवा उडवीचे उत्तर देत टाळाटाळ करत राहिले.

सविसर वृत असे कि गजेंद्र श्रावणजी गणवीर व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे 29 लाख रुपये व तसेंच इतर ग्राहकांची एकूण 3 कोटी रुपयांणी फसवणूक केली शेवटी फिर्यादी गजेंद्र श्रावनजी गणवीर वय 55 रा अंबिका नगर यवतमाळ यांच्या फिर्यादीवरून 21सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 1वाजेच्या सुमारास TWJ फ्रँचाईस बिजनेस अग्रीमेंट कंपनी विरुद्ध गुन्हा दाखल केला.

आरोपी 1) समीर नार्वेकर वय 40वर्ष CMD TWJ असो. प्रा. लि. पुणे 2)सागर मयलवार वय 38 वर्ष शाखा व्यवस्थापक TWJ. असो. प्रा. लि. यवतमाळ 3)सुरज माडगुलवार वय 37 वर्ष लेखापाल TWJ असो. प्रा. लि. यवतमाळ यांचा विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 1306/25 कलम 316/(2),318(4),3(5) कलम 3,4 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास अवधूतवाडी पोलीस करीत आहे.

आयुष्यमान कार्डाच्या तांत्रिक अडचणीने लाभार्थी मेटाकुटीस

मारेगाव :आयुष्यमान कार्ड ही केंद्र शासनाची योजना आरोग्याशी संबंधीत असतांना धान्य मिळविण्यासाठी राशन कार्ड आहे. आयुष्यमान कार्ड आणि धान्य वितरणाचा काडीमात्र संबंध नसतांना काही तांत्रिक कारणास्तव आयुष्यमान कार्ड काढण्यास विलंब झालेल्या गरीब लाभार्थ्यांचा शासकीय अन्नधान्य पुरवठा रोखून धरण्याचा बेकायदेशीर प्रकार मारेगावात घडल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आल्याने लाभार्थी पुरता मेटाकुटीस आला आहे.याबाबतचे निवेदन प्रशासनास सादर करण्यात आले आहे.

अन्न वस्त्र निवारा या मानवाच्या तीन मुलभूत गरजा आहेत. यापैकी अन्न ही अत्यंत निकडीची गरज. आर्थिक दृष्टया दिन दुबळ्या कुटुंबातील आबालवृद्ध संपुर्ण घटकांना दोन वेळेचे पोटभर भोजन मिळावे एवढीच गोरगरीबांची ही योजना येथे फोल ठरत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.

जप्त केलीली रेती घरकुल धारकांना मोफत द्या : केशव तिराणिक
शासनाच्या धोरणात्मक कार्यक्रमानुसार घरकुल बांधकामासाठी लाभार्थ्यांना पाच ब्रास निःशुल्क रेती उपलब्ध करून मिळण्याचा अध्यादेश निघाला मात्र अधिकृत रेती घाटांचा व तारीख नसलेल्या परवाना पावत्या लाभार्थ्यांच्या माथी मारुन संबंधित यंत्रणेकडून हात झटकण्यात आले.अजूनही रेती अभावी अनेकांचे बांधकामं रखडलेली आहेत. मात्र मारेगाव तालुकांतर्गत ग्रामीण क्षेत्रात रेती तस्करीतून रेतीच्या साठेबाजीला उत आलेला आहे तेव्हा अवैध रेती साठेबाजांवर फौजदारी कारवाई करून जप्त केलेली रेती गरजु घरकुल लाभार्थ्यांच्या बांधकामास देण्यात यावी अशा आशयाच्या दोन महत्त्वपूर्ण मागण्यांचे निवेदन अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली महाराष्ट्र प्रदेश महासचिव तथा आदिवासी सेवक केशव तिराणिक यांनी मारेगाव तालुक्याचे तहसीलदार निलावाड यांना दिले.यावेळी विजय तोडकर,सूर्यवंशी,पीडित लाभार्थी हर्षल चांदेकर,दर्शना चांदेकर आदींची उपस्थिती होती.

ही योजना कार्यान्वित करण्यासाठी जिल्हास्तरावरून तांत्रिक अडचण आहे. प्रशासनाच्या सातत्य पूर्ण प्रयत्नात आयुष्यमान कार्ड योजनेचा तात्काळ अंमल होईल असा आशावाद टोलेबाजचा प्रतिनिधिंशी बोलतांना तहसीलदार उत्तम निलावाड यांनी व्यक्त केला.

पोलीस स्टेशनमध्ये दुर्गा उत्सव मंडळांच्या अध्यक्ष, सदस्य आणि नागरिकांची बैठक

वणी : आगामी सण-उत्सवांमध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनातून वणी पोलीस स्टेशनमध्ये आज (दिनांक २०/०९/२०२५) सकाळी ११:०० ते १२:३० या वेळेत दुर्गा उत्सव मंडळांचे अध्यक्ष, सदस्य आणि प्रतिष्ठित नागरिकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. पोलीस निरीक्षक श्री. गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली.बैठकीमध्ये, दुर्गा विसर्जन मिरवणूक पारंपरिक पद्धतीने काढण्याबाबत आणि डी.जे. (DJ) चा वापर टाळून पारंपरिक वाद्यांचा उपयोग करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच, खालील सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले:• दुर्गा विसर्जन मिरवणुकीत मंडळाच्या जास्तीत जास्त स्वयंसेवकांनी सहभाग घ्यावा.• मिरवणुकीत कोणीही नशेत किंवा मद्यपान करून सहभागी होऊ नये.• दिलेल्या मार्गाचे (Route) आणि वेळेचे तंतोतंत पालन करावे.• विसर्जन घाटावर देवीचे विसर्जन करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता घ्यावी.• प्रत्येक दुर्गा मंडळाने नवरात्री उत्सवात मंडपात एक स्वयंसेवक पूर्णवेळ हजर ठेवावा.• नवरात्री उत्सवात कोणत्याही मंडळाने आक्षेपार्ह पोस्टर किंवा बॅनर लावू नये.या बैठकीत, गावातील कोणताही कार्यक्रम शांततेत पार पाडण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन मान्यवरांनी केले. तसेच, सर्व दुर्गा मंडळ अध्यक्ष आणि सदस्यांना डी.जे. मुक्त मिरवणुका काढण्याचे आणि विसर्जन शांततेत पार पाडण्याचे आवाहन करण्यात आले.या बैठकीला सुमारे १५० ते १७५ अध्यक्ष, सदस्य आणि पदाधिकारी उपस्थित होते.

आर्य वैश्य महिला आघाडी वणी तर्फे गरजूंना कपडे वाटप.

वणी :आज दि. २०/०९/२५ सकाळी ११ वाजता जत्रा मैदान येथे आठवडी दवाखाना घेतल्या जातो तिथे आर्य वैश्य महिला संघाने गोरगरीब व गरजू लोकांना कपडे वाटप व स्नेह भोजनाचा कार्यक्रमासह समाजातर्फे इतर सामाजिक उपक्रम जसे की वृक्षारोपण, कार्यशाळा आयोजन आणि राजकीय कार्यक्रमांमध्ये सहभाग यांसारखे कार्यक्रम आयोजित केले जात असल्याचे दिसून येते.

आर्य वैश्य समाज मंडळे विविध सामाजिक कार्यांमध्ये सक्रिय असतात आणि कपडे वाटपासारखे उपक्रम त्यांच्या समाजसेवेचा भाग आहे. समाजातर्फे इतर सामाजिक उपक्रम जसे की वृक्षारोपण, कार्यशाळा आयोजन आणि राजकीय कार्यक्रमांमध्ये सहभाग यांसारखे कार्यक्रम आयोजित केले जात असल्याचे दिसून येते.

आर्य वैश्य समाज मंडळे विविध सामाजिक कार्यांमध्ये सक्रिय असतात आणि महिला आघाडीचा सर्व सदस्य महिलांचा उपक्रमाने कपडे वाटपासारखे उपक्रम त्यांच्या समाजसेवेचा भाग असतो.

जय जय रामकृष्ण हरी,नगाजी महाराजांच्या जय घोषाने दुमदूमली मारेगाव नगरी


“जाता पंढरीसी सुख वाटे जीवा। आनंदे केशवा भेटताचि।।”

ही संत सेना महाराजांनी लिहिलेल्या अभंगातील ओळ.
या ओळींचा अर्थ आहे की पंढरपूरला जाताना जीवांना खूप आनंद होतो आणि विठ्ठल (केशव) यांना भेटल्याने त्यांना खूप सुख मिळते. पंढरपूरची महानता आणि तिथे मिळणारे सुख व्यक्त करतात.

हो! अगदी योग्यच लिहिलं महाराजांनी,
पण पंढरीचं सुख हे नगाजी महाराजांच्या चरणाशीच तर नाही ना ह्या ध्येय्याने झपाटलेला एक जगन्नाथ नगरी वेगाव येथे वास्तव्यास असलेला तरुण तेजस मांडवकर सलून व्यावसायिक गत दोन वर्षांपासून नगाजी महाराजांना शरण गेला आणि गत वर्षी पासून इंदिरा एकादशीला मारेगाव येथील नगाजी महाराज देवस्थान च्या नियोजित जागेवर श्रद्धापूर्वक तन मन धनाने कार्यक्रम घेतो आहे.
नाभिक बांधव एकत्र करून वैयक्तिक तो भजन पूजा आरती करून अन्नदान करतो. कार्यक्रमासाठी मोठया संखेने नाभिक समाजबांधव उपस्थित होते.
आणि हनुमान मंदिर येथे आरती करून दिंडीची सांगता करण्यात आली.

न भूतो अशा पारंपरिक वारकरी हरिपाठ दिंडीने वेधले शहर वाशियांचे लक्ष
पारंपरिक वारकरी संप्रदायाची दिंडी धोतर टोपी खांद्यावर शेला आणि टाळ सोबत मृदंगाचा कर्णमधुर नाद हे दिंडीचे वैशिट्य लक्षनीय होते. रस्त्यावरून ये -जा करणारे क्षणभर थबकुन आपसूकच स्वतःच्या भ्रमनध्ववनीत चित्रीकरण करतांना दिसत होते.
ना ध्वनी प्रदूषण ना वाहतुकीला खोळंबा असा अद्वितीय सोहळा संत नगाजी भक्तांनी आगळ्या वेगळ्या स्वरूपात संपन्न केला.

गहाळ झालेली मोबाईल पोलिसांना गवसले

वणी : पोलीस स्टेशन वणी येथे विविध तक्रारदार यांनी त्यांचे मोबाईल विविध ठिकाणावरून गहाळ झाल्याबाबत सविस्तर तक्रार दिली होती.

त्या तक्रारीच्या अनुषंगाने पोलीस स्टेशन वणी येथील सायबर विभागामध्ये कार्यरत असलेल्या महिला पोलीस अंमलदार छाया उंमरे यांनी CEIR पोर्टल वरून तांत्रिक दृष्टिकोनातून उत्कृष्ट तपास करून एकूण 13 मोबाईल शोधून काढले असून सदरचे हरवलेले मोबाईल हस्तगत करून आज दिनांक 18/09/2025 रोजी मोबाईल धारक मुळ मालकांना परत करण्यात आले आहेत.

सदरची कार्यवाही मा. ठाणेदार वणी यांचे मार्गदर्शनात LPC 493 छाया उंमरे यांनी केली आहे.

राष्ट्रीय लोक अदालत मध्ये 127 प्रकरणाचा निपटारा, 1,60,26,079/- रुपरांची वसुली

वणी : मा. दिवाणी न्यायालय,व.स्तर, वणी येथे राष्ट्रीय लोक अदालतचे दिनांक 13 सप्टेंबर रोजी आयोजन करण्यात आले होते. सदर राष्ट्रीय लोक अदालत मध्ये पॅनल नं.1 पॅनल प्रमुख श्री.पि.एस. जोंधळे साहेब, दिवाणी न्यायाधिश, वरिष्ठ स्तर, वणी तथा अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती, वणी, पॅनल नं.2. श्री. शहाजी दत्तराव भोसले साहेब, सह दिवाणी न्यायाधिश व न्यायदंडाधिकारी, (प्र.श्रे.) वणी, पॅनल नं. 3 मध्ये श्री.ए.बी. बिरादर साहेब, 2 रे सह दिवाणी न्यायाधिश, क. स्तर व न्यायदंडाधिकारी प्र.श्रे.वणी, तसेच पॅनल मेमेंबर श्री.धनंजय आसुटकर अॅडव्होकेट, आणि पॅनल मेंबर कु.शिरीन एम. पठाण, अॅडव्होकेट वणी उपस्थित होते.

सदर राष्ट्रीय लोक अदालत मध्ये बॅंक व पत संस्थेची दाखल पुर्व एकुण 60 प्रकरणाचा निपटारा करण्यात येवुन बॅंकेस रक्कम रु. 85 लाख 25 हजार 522 पाचशे बाविस रुपये वसुल करण्यात आले. मनी रिकव्हरी चे 03 प्रकरणाचा निपटारा करण्यात येवुन 7 लाख 60 हजार रुपये वसुल करण्यात आले.
तर चेक बाउन्स चे 13 प्रकरणाचा निपटारा करण्यात आला यामध्ये 67 लाख 20, हजार 757 रुपये ची रक्कम वसुल करण्यात आली. त्यातील चेक बाउन्सची 02 प्रकरणे 05 वर्षा वरील होती. किरकोळ गुन्ह्यांचे एकुण 51 प्रकरणाचा निपटारा करण्यात आला यामध्ये 19 हजार 800 रुपयेची वसुली करण्यात आली. अश्या प्रकारे एकुण 127 प्रकरणाचा निपटारा करण्यात येवुन एकूण रक्कम 1 एक करोड 60 साठ लाख 26 सव्वीस हजार 79 एकोणअंशी रुपयाची वसुली करण्यात आली.

सदर लोक अदालती मध्ये बहुसंख्येने पक्षकार, वकील, पोलीस कर्मचारी उपस्थित होते. तसेच न्यायालयीन न्यायाधीश तसेच कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय लोक अदालतचे यशस्वीते करिता अथक परिश्रम घेवून सदर कार्यक्रम यशस्वी केले.

न. प. मारेगाव द्वारा स्वच्छता ही सेवा अभियानास प्रारंभ.

मारेगाव. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधी जयंतीच्या पर्वावर २ ऑक्टोबर २०१४ पासून स्वच्छ भारत अभियानास सुरुवात केली.या अभियानाचे उद्दिष्ट असे की,शहरापासून ते गावखेडया पर्यंत स्वच्छते बद्धल जागरूकता निर्माण करणे, यामध्ये उघड्यावर शौचास नं जाणे, स्वतःची शारीरिक स्वछता,घनकचरा निर्मूलन, घरातील कचराअसताव्यस्त नं फेकता तो साठवून कचरा गाडीत टाकणे, ज्यामुळे परिसर स्वच्छ राहील जेणेकरून आरोग्यविषयक तक्रारी दूर होऊन निरोगी आयुष्य जगता येइल.स्वच्छ भारत अभियान हे देशव्यापी अभियान असून त्याचाच एक भाग म्हणून दीर्घ काळानंतर मारेगाव ला स्थायी स्वरूपात लाभलेले कर्तव्य दक्ष मुख्याधिकारी शशिकांत बाबर यांनी १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत स्वच्छता ही सेवा अभियान राबवण्याबाबत शासनाचे निर्देशानुसार दि.१७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता या अभियानाचा प्रारंभ नगरपंचायत सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. कार्यक्रमात मुख्याधिकारी यांनी स्वच्छता ही सेवा पंधरवाड्याचे नियोजन व त्या अंतर्गत नियोजित विविध उपक्रमांची माहिती सांगितली. ह्या पंधरवाड्यात आरोग्य शिबीर, स्वच्छता रॅली, शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा असे विविध उपक्रम नगरपंचायतद्वारे घेण्यात येणार आहेत.

दि. २५ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता एक दिवस, एक तास, एक साथ ह्या घोषवाक्यासह सामूहिक स्वच्छता मोहीम आयोजित केली आहे. कार्यक्रमात सर्व उपस्थितांना स्वच्छतेची शपथ देऊन कार्यक्रमांची सांगता करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्ष पदी नगराध्यक्ष डॉ. मनीष मस्की होते. उपाध्यक्षा हर्षा महाकुलकर, मारेगाव तहसीलचे नायब तहसीलदार महेश रामगुंडे, मारेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शाम वानखेडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितीत होते. तसेच नगरपंचायतचे मुख्याधिकारी शशिकांत बाबर (मशप्रसे), नगरसेवक हेमंत नरांजे नगरसेविका अंजुम शेख, नगरसेविका छाया किनाके यांची उपास्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कर निरीक्षक राधिका देशमुख यांनी तर आभार प्रदर्शन आस्थापना प्रमुख कविता किनाके यांनी केले.