लोहारा पोलीस स्टेशन हद्दीतील गुंड तडीपार

वणी :पोलीस स्टेशन लोहारा हद्दीत राहणारा भावेश उर्फ गोत्तु राजेद्र तिवारी रा. बोदड रोड चौसाळा त्याचेविरुद्ध वेळोवेळी प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आली असताना सुद्धा त्याचे वर्तणुकीमध्ये कोणताही बदल घडुन न आल्याने त्याला तडीपार करण्यात आले.

याचेविरुद्ध पोलीस स्टेशन यवतमाळ शहर येथे अपक्र. 288/2015कलम 324,323,506भा. द. वि. 2) पोलीस स्टेशन लोहारा येथे अपराध क्रमांक 106/2016 कलम 324,336,34 भा.द.वि, 3) अपराध क्रमांक 69/2017 कलम 324,34 भा.द.वि., 4) अपराध क्रमांक 307/2022 कलम 294,506 भा.द.वि., 5) अपराध क्रमांक 14/2025 कलम 333,115(2),324(4),352,351(2),3(5) भा.न्या.सं. प्रमाणे गुन्हे नोंद असुन त्याचेविरुद्ध वेळोवेळी प्रतिचंधक कार्यवाही करण्यात आली असताना सुद्धा त्याचे वर्तणुकीमध्ये कोणताही बदल घडुन आला नाही.

त्याचेवर दिनांक 07/07/2025 रोजी हद्दपारीचा प्रस्ताव सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहीत चौधरी पोलीस स्टेश लोहारा यांनी मा. उपविभागीय दंडाधिकारी यवतमाळ यांचेकडे पाठविला होता. सदर प्रस्ताव वरुन मा. महोदय यांनी चौकशी अंती गुंड नामे भावेश उर्फ गोलू राजेद्र तिवारी वय 30 वर्ष रा. बोधड रोड चौसाळा यास 01 वर्षापर्यंत यवतमाळ जिल्ह्याचे हद्दीमधुन हद्दपार करण्याचे दिनांक 05/12/2025 रोजी आदेश केल्यानेभावेश उर्फ गोत्तु राजेद्र तिवारी यास ताब्यात घेवुन दिनांक 09/12/2025 रोजी हद्दपारीचे आदेश तामील करण्यात आले व यवतमाळ जिल्ह्यातुन हद्दपार करण्यात आले.

यवतमाळ शहरातील बोदड व वाघापुर परिसरात शांतता व सुव्यवस्था अबाधीत राहावी याकरीता माननिय पोलीस अधिक्षक कुमार चिंता यांचे आदेशाने तसेच अप्पर पोलीस अधिक्षक अशोक धोरात व उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाने यांचे मार्गदर्शनात ठाणेदार रोहीत चौधरी, पोउपनि गजानन अजमीरे, मपोना रजनी गेडाम, पोहवा अमोल अन्नेरवार, नकुल रोडे, पवन चिरडे, बबलु पठाण, प्रशांत राठोड, रितेश मस्के यांनी कार्यवाही केली.

नॉयलॉन मांजा विकणाऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

वणी: पोलीस अधीक्षक यांचे ओदशाने महाराष्ट्र मध्ये प्रतिबंधीत नॉयलॉन मांजा विकी करिता आणणाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. त्यावरून माहिती काढली असता पो.स्टे. यवतमाळ शहरतील मारवाडी चौक येथे पंतग विकी चा व्यवसाय करणारा कृष्णकुमार उर्फ बन्टी सिओटीया हा नॉयलॉन मांजा विकत आहे. अशी खात्रीशीर माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेने कार्यवाही केली.

मिळालयाने माहिती वरून त्याचे कडे नायलॉन दोरा मांजा यावर महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेली असतांना देखिल मागील आठवडया पासुन तोनायलॉन दोरा मांजा विक्री करीत आहे. मारवाडी चौक येथील पंतग विकी करणाऱ्या दुकानात गेले असता दुकानात जावून कृष्णकुमार उर्फ बन्टी सिओटीया हा मांजा विकी करताना मिळून आला.

त्या ईसमास आमची व पंचाची ओळख देवुन तेथे येण्याचा उददेश समजावुन सांगीतला त्यानंतर पंचा समक्ष कृष्णकुमार उर्फ बन्टी सिओटीया याच्या दुकानातील पांढऱ्या रंगाच्या पोत्या मध्ये पाहणी केली असता त्या मध्ये नॉयलॉन मांजा 1. गोल्ड नायलॉन मांआ 13 बन्डल प्रती700/रू. प्रमाणे9,100/-रू, 2. नायलॉन मांजा चकरी मध्ये गुडांळलेला 13 चकऱ्या प्रती300/रू. प्रमाणे 3,900रू.या मुद्देमाल एकुण 13,000/- रू.चा मांजा नॉयलॉन दौरा पंचनाम्या प्रमाणे जप्त करून त्यास पुढील कार्यवाही करिता यवतमाळ शहर यांचे ताब्यात देण्यात आले. नागरीकांना आव्हान करण्यात येते की, नॉयलॉन मांजा यवतमाळ जिल्हयात विकी विषयी माहिती प्राप्त झाल्यास पोलीसाना माहिती दयावी.

हि कारवाई मा. पोलीस अधीक्षक यवतामळ, कुमार चिंता , अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपिवभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक सतीश चवरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, यांचे मार्गदर्शनात सपोनि मनिष गावंडे, पोउपनि गजानन राजमलू, सफै/सै. साजीद, योगेश गटलेवार, पोहवा / अजय डोळे, पोहवा रूपेश पाली, पोहवा / योगेश डगवार, पोहवा / रितुराज मेडवे पोहवा/सचिन घुगे, पोकों सुनिल पैठणे, पोकों/देवा होले, पोकों/आकाश सुर्यवंशी स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

ज्ञानसूर्य बाबासाहेबांना आदरांजली शहरात कॅण्डल रॅलीने वेधले लक्ष

वणी: मारेगाव :ज्ञानाचा अथांग महासागर ज्ञानसूर्य भारतरत्न डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शनिवारी सकाळी मारेगाव येथे लीन होवून शेकडोनीं आदरांजली वाहिली. भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार परमपूज्यु डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी ६ डिसेंबर रोजी सकाळी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चिमुकल्यासह पालकांनी आदरांजली वाहिली.

यावेळी फुले शाहू आंबेडकरी विचारसरणीला मानणारे पांढरे शुभ्र वस्र परिधान करून बाबासाहेबांना वंदन करीत होते. शेकडोनीं मेणबत्ती, अगरबत्ती प्रज्वलीत करीत माल्यार्पण केले. सामूहिक बुध्द वंदना आणि धम्मराजिका बुध्द विहारात त्रीशरण पंचशीलाचे सामूहिक पठण करण्यात आले.सायंकाळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची शेकडो अनुयायीच्या सहभागात कॅण्डल रॅली शहराच्या विविध मार्गाने मार्गक्रमण करीत ध्वनीक्षेपकाच्या मधुर आवाजात ” बुद्धम.. सरणं.. गच्छामी..! बुद्ध वंदनेने आदरांजली वाहण्यात आली. स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यानजीक मेनबत्ती प्रज्वलीत करीत सामूहिक बुध्द वंदनेने महापरिनिर्वाण दिनाची शेकडोच्या उपस्थितीत सांगता झाली.

कार्यक्रमासाठी उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला. याप्रसंगी मारेगाव नगरपंचायत प्रशासनाचे मुख्याधिकारी शशिकांत बाबर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य, संघर्ष आणि दूरदृष्टीकोनावर शब्दरूपी प्रकाश टाकला.

सोयाबीन पिकाला तातडीने गुणवत्तेनुसार योग्य भाव देण्याबाबत मनसेचे तहसीलदारांना निवेदन “

वणी : सोयाबीन पिकाला तातडीने गुणवत्तेनुसार योग्य भाव देण्याबाबत 03 डिसेम्बर 025 ला मनसे कडून वणी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे यावर्षीच्या सोयाबीन पिकाच्या गंभीर समस्या असून यावर्षी वणी तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त अतिवृष्टी झाल्यामुळे सोयाबीन पिकामध्ये नैसर्गिक बदल झाला आहे, ज्यामुळे शेतातील उभे सोयाबीन पीक काही प्रमाणात काळपट (रंग उतरलेला) झाले आहे.

हया पिकातील बदल नैसर्गिक असून, तो अतिवृष्टी मुळे झाला आहे, यात शेतकऱ्याचा कोणताही दोष नाही. सध्या, कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (APMC) तपासणी अधिकारी मालामध्ये जाणीवपूर्वक किरकोळ दोष काढून सोयाबीन पिक अयोग्य ठरवून तो रद्द करत आहेत. परिणामी, शेतकऱ्यांना आपले पिक एकतर परत घरी घेऊन जावे लागत आहे किंवा नाईलाजास्तव खाजगी व्यापाऱ्यांना अत्यंत कवडीमोल भावाने विकावा लागत आहे.

या गंभीर परिस्थितीत, शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान थांबवण्यासाठी, प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा. ज्याप्रमाणे कपासीच्या पिकाला त्याच्या दर्जाप्रमाणे (Quality Grade) दर निश्चित केला जातो, त्याच धर्तीवर यावर्षीच्या सोयाबीन पिकालासुद्धा त्याच्या गुणवत्तेनुसार (उदा. रंग, ओलावा विचारात घेऊन) दर निश्चित करून तो खरेदी करण्यात यावा.आपण शेतकऱ्यांचे झालेले नुकसान आणि त्यांची वर्तमान आर्थिक स्थिती लक्षात घेऊन, या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन शेतकऱ्यांचेआर्थिक नुकसान थांबवावे.

असे मनसे नेते फाल्गुन गोहोकर,प्रमोद कोल्हे, लकी सोमकुवर, प्रवीण कळसकर, नितीन चहाणकर, रवी वनकर, रुपेश पेचे, धीरज भगवा, संतोष गोंडे, धीरज पेचे, आशिष चहाणकर, आशिष ठावरी, सुरज काकडे, प्रशांत शेंडे, अमोल लांबट यांनी दिले.

संघटनात्मक अडचणी आणि कमी झालेली स्थानिक पकड त्यांच्यासाठी ही निवडणूक अधिक आव्हानात्मक बनवत आहे.

वणी:महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने अचानक स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्याने आघाडीतील संतुलन ढासळले आहे. राष्ट्रवादीकडून स्वतंत्र नगराध्यक्ष पदासह ११ उमेदवार रिंगणात उतरवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, हिंदू–मुस्लिम ऐक्याचे प्रतिक मानला जाणारा उमेदवार दिल्याने एकता आणि सामाजिक सलोखा यांचा संदेश देण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न स्पष्ट दिसून येत आहे.

मात्र, या निर्णयाचा महाविकास आघाडीच्या मतांवर थेट परिणाम दिसू लागला आहे. परंपरागत मतदारांत विभाजन निर्माण झाल्याने आघाडीपुढे नवे समीकरण जुळविण्याचे कठीण आव्हान उभे राहिले आहे.

राजकीय घडामोडींनी रंगलेली वणीची ही निवडणूक आता चुरशीची होणार हे स्पष्ट झाले आहे. शिंदे गटाची आक्रमक खेळी, भाजपची कमकुवत झालेली ताकद आणि राष्ट्रवादीच्या स्वतंत्र लढतीमुळे निर्माण झालेली अनिश्चितता — या तिहेरी संघर्षात नगरपरिषदेचा कौल अखेर कोणाला मिळणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

वणी :महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सहाय्यक संघटना यवतमाळ जिल्हा अध्यक्ष तथा मारेगाव तालुका अध्यक्ष आमचे लाडके खुशाल भाऊ येरगुडे यांना वाढदिवसाच्या खुप-खूप हार्दिक शुभेच्छा..!!

शुभेच्छुक:- टोलेबाज न्यूज टीम,शैलेंद्र पेंदोर, भगवान धाबेकर,गजानन बोधे, हरिश्चन्द्र डाहुले

वणी नगरपरिषद निवडणूक : प्रभाग क्र. ११ ‘ब’ मध्ये वंचित बहुजन आघाडीचा ‘मास्टरस्ट्रोक’…!

वणी :राज्यात अनेक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबद्दल संभ्रम असतानाच, वणी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी मात्र अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. याच अंतिम टप्प्यात प्रभाग क्रमांक ११ ‘ब’ मध्ये राजकीय वारे वेगाने फिरले असून, वंचित बहुजन आघाडीने युवा अपक्ष उमेदवार प्रशांत शामराव नक्षणे यांना आपले खुले समर्थन जाहीर केले आहे. या पाठिंब्यामुळे प्रभाग ११ ‘ब’ मधील राजकीय समीकरणे बदलली असून, प्रशांत नक्षणे यांची बाजू भक्कम झाली आहे.​

आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना प्रशांत नक्षणे यांनी प्रस्थापित राजकीय पक्षांवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, “केवळ जातीय समीकरणे आणि पैशाच्या राजकारणामुळे प्रस्थापित पक्षांनी मला डावलले आणि उमेदवारी नाकारली. सर्वसामान्य आणि वंचित घटकातून आलेल्या माणसाला जनतेची सेवा करण्याचा अधिकार नाही का? ही चीड मनात ठेवून मी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे.”​माझ्याकडे कोणतेही पद नसताना मी आजवर निस्वार्थपणे समाजकार्य केले आहे आणि यापुढेही जनतेची सेवा हेच माझे एकमेव ध्येय असेल, असे नक्षणे यांनी स्पष्ट केले. वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या बिनशर्त पाठिंब्याबद्दल त्यांनी पक्षाचे आभार मानले.​

वंचित बहुजन आघाडीचे विधानसभा प्रमुख राजू निमसटकर यांनी यावेळी भाजपसह काँग्रेस आणि उबाठा गटावर सडकून टीका केली. ते म्हणाले, “हाय-फाय विकासाच्या गप्पा मारणाऱ्यांनी वणीच्या जनतेची केवळ लुटमार केली आहे. आजही शहरात आठवड्यातून केवळ एकदा पाणी येते, गल्लोगल्ली घाणीचे साम्राज्य आहे, रस्ते नाहीत, पथदिवे नाहीत आणि नजुल जमिनीचे प्रश्न प्रलंबित आहेत. सरकारी तिजोरी लुटणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठीच वंचित निवडणूक लढवत आहे.”

प्रशांत नक्षणे यांच्यासारख्या तडफदार आणि जमिनीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्याला वंचितने आपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. जनतेने नक्षणे यांना भरभरून मतांनी निवडून द्यावे, असे आवाहन निमसटकर यांनी केले. तसेच, “वणी नगरपरिषदेत वंचितची घोडदौड सुरू असून, वंचितशिवाय कोणाचीच सत्ता बसणार नाही,” असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला.​

आयोजित पत्रकार परिषदेला अपक्ष उमेदवार प्रशांत नक्षणे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव मिलिंद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष मंगल तेलंग, तालुका महासचिव आशिष पाझारे, बंटी तामगाडगे आणि नीरज मोडक प्रामुख्याने उपस्थित होते.

सोशल मीडियातून अपप्रचार केल्यास कार्यवाही होणार “

वणी : निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रत्येकाला सोशल मीडियातून प्रचार करण्याची मुभा आहे परंतु सामाजिक शांतता भंग होईल किंवा सामाजिक दृष्ट्या तणाव निर्माण होईल अशा सोशल मीडियावर पोस्ट टाकणाऱ्यावर कठोर कारवाईचे आदेश निवडणूक आयोगाने दिले असून नियमांच्या अधीन राहूनच पोस्ट टाकाव्यात. असे यवतमाळ पो. अधिक्षक कुमार चिंता यांनी केले.

यवतमाळ जिल्ह्यात नगरपरिषद व नगरपंचायतमध्ये प्रचाराची धूमाकुळ सुरु आहे कमी वेळात मतदारा पर्यंत सोशल मीडिया माध्यमातुन प्रचार सुरु आहे उमेदवारांनी आपल्या प्रचाराच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करण्यापूर्वी ती समाजात जातीभेद, अफवा, अपप्रचार समाजात अशांतता पसरनार नाही याची खात्री करून टाकाव्यात.

अशा सर्व सोशल मीडियाचा सर्व पोस्टवर सायबर पोलीसांचा वॉच असून कायद्याचे उल्लंघन केल्यास निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कोणतीही नोटीस न देता यात जामीनाशीवाय अटक, दंड व शिक्षेची तरतूद आहे. तरी सर्व उमेदवाराणी निवडणूक आयोगाचा अधीन राहून सामाजिक शांतता भंग होणार नाही याची खात्री करून पोस्ट टाकाव्यात अन्यथा कारवाई होणार.

चोरीचा मोटार सायकलचा पर्दाफाश”

वणी :22नोव्हेंबर 025रोजी लोहारा पोलिसांना गुप्त माहिती वरून एक युवक चोरीचा मोटार सायकल विक्री करीती ग्राहकाचा शोधात फिरत आहे अशा माहिती वरून लोहारा पोलिसाना मोटर सायकल चोरीचा मोठा गुन्हा उघडकीस आणण्यात यश आले आहे.

सविस्तर एक युवक संशयतरित्या चोरीचा मोटार सायकल विकण्याचा उद्देशाने फिरत वरून असल्याचे माहिती वरून त्या ठिकाणी गेले असता युवक नागपूर येथे गेला असल्याचे समजले तात्काळ लोहारा पोलिसाचे एक पथकाने नागपूर गाठून अक्षय उर्फ हिमेश सतीश जैन वय 32 वर्ष रा.मोठे वडगाव धर्माजी नगर यवतमाळ त्यास ताब्यात घेऊन लोहारा पोलीस स्टेशनला आणले.

त्यास विचारपूस केली असता त्याने उडवाउडीवचे उत्तर दिले विश्वासात घेऊन सखोल चौकशी दरम्यान आरोपीने लोहारा परिसरातुन दोन मोपेड व एक मोटर सायकल चोरी केल्याचे कबूल केले आरोपीचा ताब्यातून पोस्टे. लोहारा अप. क्र. 375/025 कलम 303(2)बि.एन.एस. मधील एक मोपेड TVS वेगो, अप. क्र. 381/025 कलम 303(2)बि. एन. एस. मधील प्लेझर मोपेड व सरकारी दवाखान्या जवळून एक हिरो होंडा स्प्लेंडर अशा तीन गाड्या लपवीलेल्या जागेवरू अंदाजे 1,20,000 रू.मुद्देमाल जप्त केला.

हि कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता,अप्पर पो.अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पो. अधिकारी दिनेश बैसाणे, यांच्या मार्गदर्शनात पो. स्टे. लोहारा ठाणेदार रोहित चौधरी व यांच्या टीमने केली.

करूण व हास्यरस युक्त भारुडाच्या पर्वणीने मारेगावकर मुग्ध. जहर पीने वाला अकेला ही मरता है ; लेकिन दारू पीने वाला पूरे परिवार को मारता है | -भारुड सम्राट गोविंद महाराज गायकवाड

वणी :मारेगाव मराठी लोककलेच्या प्रकारातील भारुड हा एक पौराणिक प्रकार संत एकनाथ महाराजांच्या काळापासून लोकप्रिय झाला. भारुड हा प्रकार संगीत,नाटक आणि कविता यांचा एकत्रित अविष्कार आहे, यातून लोकांना आध्यात्मिक शिक्षण आणि नैतिक तत्वे मनोरंजनाच्या माध्यमातून अत्यंत सोप्या पद्धतीने शिकविली जातात.” लेकं वडाची पारंबी दोन्ही घराला जोडते, असो सासर माहेर पांग बापाचं फेडते ” बाप लेकीच्या ह्या ओवीचं निरूपन करताना, मुलगी ही वडीलाच्या काळाजाचा तुकडा असते तिच्या जन्माने वडिलांचे जीवन पूर्ण होते मुलीचे वडीलाच्या जीवनातील महत्त्व त्यांनी वरील ओवी समजावून सांगत असताना समोर बसलेल्या तमाम श्रोत्यांच्या डोळ्यात पाणी तरळल.

तसेच व्यसनाधीन झालेल्या पिढीला दारू ही विषयापेक्षा किती गंभीर आहे हे एकाच वाक्यात समजवतांना महाराज म्हणाले” जहर पीने वाला अकेला ही मरता है, लेकिन दारू पीने वाला पूरे परिवार को रोज मारता है ” म्हणून दारू ही विषपेक्षाही भयंकर आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे अलीकडे शेती व्यवसाय धोक्यात आल्याने शेतकरी आत्महत्येचा पर्याय शोधत आहे, त्यांनी आत्महत्या न करता धैर्याने प्रसंगाला तोंड देण्याचे आवाहन महाराजांनी भारुडातून केले.

भारुडकार हे स्त्रीच्या वेषात असतात, भारुडातील नाट्यरूपी लग्नात मला बघायला आलेल्या पं.प्र.मोदी, दादा कोंडके, सिने अभिनेते राजकुमार व नाना पाटेकर यांच्या आवाजाची हुबेहूब नक्कल करताना करून रसातून प्रेक्षकांच्या डोळ्यात तळलेले पाणी त्यांनी डोळ्यातच जिरवलं आणि हास्याचे कारंजे उडाले. संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या ” गुरगुंडा ” या पात्राने मारेगावकरांचे लक्ष वेधले. भारुडाच्या यशस्वी आयोजनात गौरीशंकर खुराणा संस्थापित जनहित कल्याण संघटनेची संपूर्ण चमू,मारेगाव तालुका काँग्रेस कमिटीचे सर्व सदस्य व पदाधिकाऱ्यांचा मोलाचा वाटा होता.