कर्कश आवाज करणाऱ्या बुलेटवर वणी वाहतूक शाखेची कार्यवाही

वणी : वणी शहरात कर्कश आवाज करत बुलेट चालवणाऱ्या वाहन चालकांवर वाहतूक नियंत्रण शाखा वणी मार्फत कार्यवाही करण्यात आली .बुलेटचे कर्कश आवाज करणारे सायलेन्सर काढून जप्त करण्यात आले.

मूळ कंपनीचे सायलेन्सर लावल्यानंतरच त्यांचेवर मोटर वाहन कायद्या अंतर्गत कार्यवाही करून दंडाची रक्कम भरून घेऊन सदर बुलेट वाहने सोडण्यात आली. बुलेट वापरणाऱ्या वाहन चालकांनी मूळ कंपनीचे सायलेन्सर बुलेट ला वापरावे व कायद्याचे पालन करावे असे वाहतूक नियंत्रण शाखा वणी तर्फे आवाहन करण्यात येत आहे.

“यवतमाळ मध्ये जुना वाद रंगला, एकास लोखंडी पाईप ने मारहाण “

वणी : यवतमाळ शहरात जुने भांडण पुन्हा रंगले आणि एका तरुणाची जखमी अवस्था झाली. 14 ऑक्टोबर 2025 रोजी संध्याकाळी सुमारे 6.30 वाजता दरम्यान कुंभारपुरा येथील कब्रस्थानासमोर घडली.

सविस्तर वृत्त शेख सज्जाद शेख अकबर(वय 28) याला, जावेद शाह यासीन शाह (वय 40 रा. कुंभारपूर कळंब चौक यवतमाळ) आणि गड्डु तात्या उर्फ मोहम्मद अहेफाज मोहम्मद जावेद (वय 25) यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून मारहाण केली. आरोपींनी हातातील लोखंडी पाईप आणि चाकू वापरून शेख सज्जादच्या पोट, पाय, छाती आणि मांडीवर जबर मारहाण केली, ज्यामुळे त्याला गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या असून शेख अकबर शेख रोशन (वय 70 रा. कुंभारपुर कळंब चौक यवतमाळ) यांच्या फर्यादीच्या जवानी रिपोर्ट वरून 894/25 अंतर्गत कलम 109, 3(5) गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.

यवतमाळमध्ये उधारी पैशाच्या वादावरून दगडांने मारले —

वणी : यवतमाळ शहरात उधारीच्या पैशावरून एक तुफानी मारहाण झाली आहे. अनुश्री पार्क, पिंपळगाव रोड यवतमाळ येथे घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विक्रम त्रंबकराव सानप (वय 47, रा. अनुश्री पार्क) यांनी शंकरराव सावर बंदे (वय 35, रा. अनुश्री पार्क) यांच्याकडे ₹5000 मागितले. यावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला.

वादाच्या भरात आरोपीने शिवीगाळ करत हातातील दगड फेकून फिर्यादीच्या कपाळावर मारले, तसेच “जिवे मारतो” अशी धमकी दिली. ही घटना 10ऑक्टोबर 25 रोजी सकाळी 11.00 वा.दरम्यान घडली. सदरचा गुन्हा 15ऑक्टोबर 25 रोजी दुपारी 1.15 वा. दाखल करून

यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात अप. क्र. 893/25, कलम 118(1), 352, 351(2)(3) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास यवतमाळ शहर पोलीस करीत आहे.

अपघातात मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबास युवक काँग्रेसची आर्थिक मदत

वणी – मुकुटबन मार्गांवर असलेल्या ताज हॉटेल समोरील रोडवर मुरधोनी फाट्याजवळ मागाहून येणाऱ्या ट्रॅकच्या जोरदार धडकीमुळे सायकलस्वार कामगार महेंद्र सदाशिव देठे (40)रा. रंगनाथनगर, वणी यांचा दि. 25 ऑगस्ट 2025 ला अपघात झाला होता.

प्रकृती सिरिअस असल्यामुळे वणी वरून पुढील उपचारासाठी नागपूरला नेताना रस्त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी सीमा देठे व दोन मुली आहे. संसार चालवीणारा अपघातात निघून गेल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा जणू डोंगरच कोसळल्या सारखे झाले. ही बातमी कळताच सदभावनेने, मृतकाच्या कुटुंबाची विचारपूस करून त्यांचे दुःख थोडे फार का होईना कमी करण्यासाठी, त्यांचे सांत्वन करण्यासाठी, लातूर निवासी, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव श्रीनिवास मधुकररावजी एकुर्केकर यांनी मृताकाची पत्नी व त्यांच्या दोन मुली यांना दैनंदिन जीवनासाठी लागणाऱ्या वस्तू देऊन व आर्थिक मदत करून मृतात्म्यास खरी श्रद्धांजली वाहिली.

तसेच त्यांच्या दोन मुलींना पुढील शिक्षणासाठी शैक्षणिक मदत करण्याचे आस्वासन दिले. दिवाळी सारखा सण जवळ आला असतांना, लातूर सारख्या दूर असलेल्या शहरातून येऊन श्रीनिवासजी एकुर्केकर यांनी केलेल्या मदतीमुळे मृताकाची पत्नी सीमा देठे यांनी पाणावलेल्या डोळ्यांनी, हातजोडून नमस्कार करून त्यांचे आभार मानले.
या प्रसंगी पंढरीनाथ सोनटक्के (से. नि . मु. मार्की बु ), छगन मेंढे, दाभाडीचे सरपंच सुभाष कुडमेथे, सुनील कुमरे, झरीचे प्रशांत निमसलकर, पवन कुडसंगे व वासुदेव आत्राम उपस्थित होते.

पोलीस स्टेशन महागांव येथे गांजा शेती करणाऱ्यावर NDPS अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची कारवाई

वणी : यवतमाळ जिल्ह्यातील महागांव पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे नगरवाडी शेतशिवारात अवैध गांजा झाडांची लागवड करणाऱ्या इसमावर स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी NDPS कायद्यान्वये थेट हातकडी घालून जबरदस्त कारवाई केली आहे.

मा. पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता (भा.पो.से) यांच्या आदेशानुसार, जिल्ह्यातील अवैध धंदे, शस्त्र बाळगणारे तसेच गुंगीकारक औषधद्रव्याची तस्करी यांचे समूळ उच्चाटन व्हावे, या हेतूने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांना गोपनीय माहीतीवर कार्यवाहीचे आदेश देण्यात आले होते.

दिनांक 14 ऑक्टोबर 2025 रोजी, स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ (कॅम्प पुसद) पथकाला गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, मौजे नगरवाडी (ता. महागांव) येथील इसम गजानन नारायण मेटकर यांनी आपल्या शेतशिवारात — सर्वे नं. 12/01 — गांजा अंमली पदार्थाची झाडे लागवड केली आहे.तत्काळ वरिष्ठांना कळवून पथकाने छापा टाकला. पंचासमक्ष पाहणी केली असता, एकूण 31 लहान-मोठ्या आकाराची, 37 किलो 500 ग्रॅम वजनाची गांजाची झाडे मिळून आली. याची एकूण किंमत तब्बल ₹1,87,500/- इतकी असून सदर मुददेमाल जप्त करून आरोपी गजानन नारायण मेटकर (वय 50, रा. नगरवाडी, ता. महागांव) याला ताब्यात घेण्यात आले.महागांव पोलीस स्टेशनमध्ये NDPS कायद्या कलम 8(ब), 20(b)(i) अन्वये गुन्हा क्रमांक 520/2025 प्रमाणे नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता (भा.पो.से), मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक थोरात (म.पो.से), मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. हनुमंत गायकवाड, तसेच मा. पोलीस निरीक्षक श्री. सतीश चवरे (स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ) व श्री. धनराज निळे (पो. स्टे. महागांव) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.कारवाईत सपोनि धिरज बांडे, पोउपनि शरद लोहकरे, सफौ मुन्ना आडे, पोहवा संतोष भोरगे, पोहवा तेजाव रणखांव, पोहवा सुभाष जाधव, पोहवा कुणाल मुंडोकार, पोहवा रमेश राठोड, पोशि सुनिल पंडागळे, चापोउपनि रविंद्र श्रीरामे, पोशि राजेश जाधव (सर्व स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ) यांनी अतिशय धाडसी व नियोजनबद्ध पद्धतीने ही कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली.

घोन्सा येथील सरपंच मंगेश मोहुर्ले यांना “महाराष्ट्र रत्न पुरस्कार प्राप्त ..!

वणी ः-तालुक्यातील घोन्सा ग्रामपंचायात सध्या कौतुकाचा विषय ठरत आहे. संपुर्ण तालुक्यात प्रत्येक कामात अग्रगन्य असलेल्या घोन्सा ग्रामपंयात सरपंच मंगेश मोहुर्ले यांनी वणी तालुक्याच्या शिरपेच्यात मानाचा तुरा रोवला आहे.
नालंदा ऑर्गेनायजेशन संस्थेच्या सर्वेक्षणा दरम्यान महाराष्ट्र रत्न सन्मान सोहळा 2025 नुकताच पार पडला. यामध्ये महाराष्ट्रातील शेकडो ग्रामपंचायतींचा सहभाग होता. यामध्ये वणी तालुक्यातील घोन्सा ग्रामपंचायतीला प्रथम क्रमांक मिळत , घोन्सा गावाचे प्रथम नागरीक , सरपंच मंगेश मोहुर्ले यांना “सरपंच महाराष्ट्र रत्न” सन्मानाने पुरस्कृत करण्यात आले.

हा पुरस्कार गाव पातळींवर केलेल्या कामांची पावती म्हणुन सरपंचाना बहाल करण्यात येतो . घोन्सा येथील सरपंच मंगेश मोहुर्ले यांनी आपल्या कार्यकाळात, ग्रीन एनर्जी (सोलर) पाणी पुरवठा , ग्रामस्थांना गरम व थंड पाणी मोफत, शुद्ध पेयजल , स्वस्थ आरोग्य,संपूर्ण गावात भूमिगत गटारे , स्वच्छ सुंदर सिमेंट काँक्रिट रस्ते , सुंदर व निसर्ग रम्य परिसर असलेले ग्रामपंचायत भवन,शिक्षण व अभ्यासिका अशा अनेक सुविधा ग्रामस्थांनपर्यंत पोहचविण्याकरिता अनेक पत्रव्यवहार करुन गावात ओढावले घेतल्या,हे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेली अखंड धडपड यांचे यथोचित फळ आहे. त्यामुळे संपुर्ण घोन्सा गावाचे व सरपंच मंगेश मोहुर्ले यांचे संपुर्ण तालुक्यात मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे.

दिग्गज नेते विजय बाबू चोरडिया शिवसेना शिंदे गटात प्रवेश

वणी : वणी शहरातील सामाजिक क्षेत्रात नेहमी अग्रेसर राहून समाजसेवेच्या माध्यमातून अनेकांना मदतीचा हात देणारे प्रख्यात भाजपा पदाधिकारी विजय बाबू चोरडिया यांनी अखेर शिंदे गटाचा झेंडा हाती घेतला आहे. त्यांच्या प्रवेशामुळे स्थानिक राजकारणात नवी चर्चा रंगली आहे.मुंबई येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विजय बाबू चोरडिया यांचा शिवसेना (शिंदे गट) मध्ये अधिकृत प्रवेश सोहळा पार पडला. या प्रसंगी अनेक मान्यवर व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.विजय बाबू चोरडिया यांच्या पक्षप्रवेशामुळे वणी तालुक्यात शिंदे गटाला नवसंजीवनी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यांच्या कार्यकुशलतेमुळे आणि जनसंपर्कामुळे पक्ष संघटनेला नवचैतन्य लाभेल, असा विश्वास स्थानिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

0८ करोड ६३ लाख रुपयाची फसवणूक

वणी : यवतमाळ धामणगाव रोडवरील करळगाव गावातील ७ ऑक्टोबर २०२५ चे अंदाजे दुपारी २वा.गावरान धाबा येथे येऊन भेट झाली व आम्ही  बेंबळा वेली शेतकरी उत्पादन कंपनी अशा ट्रेडिंग कंपनीच्या नावाने काम करतो असे सांगून एकूण 0८करोड ६३लाख रुपयाची फसवणूक केली. 

सविस्तर वृत्तअसे यातील आरोपी १)कानाराम भगतराम जाट वय २६ रा. धनारी खुर्द जोधपूर २)रवींद्र पुनिया वय २५ रा. बर्निया जोधपुर राजस्थान ३)करमवीर सिंग वय २५रा. राजस्थान ४) श्रावणपूर्ण रा.राजस्थान यांनी संगणमत करुन गावरान धावा करळगाव येथे  येवून फिर्यादी सोबत चर्चा करून आम्ह ट्रेंडींग कंपनीत काम करीत असल्याचे सांगुन बेंबळा व्हेली शेतकरी उत्पादक कंपनीशी तुमचा करार करून देतो तसेच आमची कंपनी तुम्हाला वेगवेळया सुवीधा पुरवुन तुम्हाला  सिमकार्ड तसेच व्यवहाराकरीता 50 लाख रुपये देईल असे सांगुन इतरांकडुन बँकखातेचे कागदपत्रे, आधारकार्ड, पॅनकार्ड, इंटनेट बँकिंगची सेवा सुरु करुन देवून तीन महीन्यानंतर तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होईल असे सांगितले नंतर फिर्यादी व ईतर लोकांच्या बँक खात्यामधुन वेगवेगळया गेमींग अॅप वरुन एकुण 08 करोड 63 लाख रु. रक्कम परस्पर वळती करुन फसवणुक केली.अशी टिकाराम उकडराव राठोड वय ५५ वर्ष बाणगाव ता. नेर जिं. यवतमाळ यांच्या फिर्यादी जबानी रिपोर्ट वरून दि. १०ऑक्टोबर२०२५ चा रात्री अंदाजे १०वा. ४७५/२५ कलम ३१८(४), ३(५)भान्यास सदरचा गुन्हा नोंदकरून पुढील तपास ग्रामीण पोलीस करीत आहे.

जिल्हयातील २७९ हिस्ट्रीशीटर व निगराणी बदमाशांची गुन्हे न करण्याची प्रतिज्ञा घेतली

वणी : यवतमाळ मा. पोलीस अधीक्षक श्री कुमार चिंता यांनी यवतमाळ जिल्ह्यातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्याच्या उद्दशाने एक आगळी वेगळी मोहीम राबवून घडणाऱ्या गुन्ह्याची पडताळणी करून गुन्हेगाराचा गुन्ह्यातील सहभाग, सराईत गुन्हेगार, दोन किंवा अधिक गुन्हे शिरावर असलेले गुन्हेगार यांचा सामाजिक दृष्टीने त्यांच्या मानसिकतेत बदल व्हावा व त्यांना गुन्हेगारीपासून परावृत्त करता यावे याकरिता दि.११ ऑक्टोबर २०२५ रोजी एक आगळीवेगळी मोहीम राबविण्यात आली.

मोहिमे अंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक उपविभाग स्तरावर उपविभागीय पोलीस अधिकारी त्यांच्या कार्यालय तसेच जिल्हास्तरावरील यवतमाळ उपविभागातील सर्व पोलीस ठाणे यांना पोलीस मुख्यालय यवतमाळ येथे पोलीस ठाण्याच्या अभिलेखावर असलेले हिस्ट्रीशीटर, निगराणी बदमाश व दोन किंवा त्यापेक्षा अधिक गुन्हे नोंद असणारे सराईत गुन्हेगार यांना एकत्र आणून त्यांना गुन्हेगारीपासून परावृत्त करण्याकरिता समुपदेशन व्हावे व ज्यांना प्रामाणिकपणे रोजगाराची संधी हवी आहे अशा गुन्हेगारांना ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत रोजगाराची संधी उपलब्ध करून देता यावी याकरिता मा. पो. अधीक्षक श्री कुमार चिंता यांनी ही आगळी वेगळी मोहीम राबविण्याचे जिल्हास्तरावर आदेश देण्यात आले आहे.

तसेच आज रोजी जिल्ह्यातील सर्वच उपविभागातील उपविभागीय पोलीस अधिकारी यांना हिस्ट्रीशीटर, निग्रणी बदमाश व दोन पेक्षा जास्त गुन्हे नोंद असणारे गुन्हेगार यांना एकत्र आणून त्याच प्रमाणे यवतमाळ उपविभागातील गुन्हेगारांना पोलीस मुख्यालय यवतमाळ येथे एकत्र जमवून त्यांना गुन्हेगारी पासून परावृत्त करण्या करिता मा. पो. अधीक्षक श्री कुमार चिंता यांनी स्वतः समुपदेशन केले.

 तसेच यवतमाळ उपविभागातील ८७, पुसद उपविभागातील ५७, दारव्हा उपविभागातील ४२, वणी उपविभागातील २६, पांढरकवडा उपविभागातील २५ आणि उमरखेड उपविभागातील ४३ अशा एकूण २७९ हिस्ट्रीशीटर व निगराणी बदमाशांची पोलिसांकडून झाडाझडती घेण्यात आली. 

तसेच गुन्हेगारांनी पुन्हा गुन्हेगारीकडे वळू नये व प्रामाणिकतेची कास धरून स्वतः बरोबर समाजाचे विकासात हातभार लावावा याकरीता त्यांच्याकडून खालील प्रमाणे प्रतिज्ञा घेण्यात आली.

अनुदानित आदिवासी आश्रम शाळा सावरखेड येथे बिरसामुंडा जयंती साजरी

वणी : सावरखेड,तालुका राळेगाव येथील अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रम शाळा येथे क्रांतिवीर बिरसा मुंडा यांची १५० वी जयंती साजरी करण्यात आली.

यांच्या १५० व्या जयंती निमित्त राष्ट्रीय जनजाती गौरव वर्ष अभियाना अंतर्गत आज दिनांक ११ ऑक्टोबर २०२५ रोजी येथे आदिवासी क्रांतीवीराची ओळख यामध्ये गोंडवाना क्रांतीवीर नारायन सिंग उईके यांच्यावर व्याख्यान आयोजित केले होते. प्रमुख वक्ते श्री. पवन आडे सर यांनी क्रांतिवीर नारायण उईके यांचा जीवन परिचय दिला. नारायण उईके यांचा जन्म ११ जुलै १९१७ ला झाला. १९५२ ला ते आमदार म्हणून निवडून आले त्या काळात त्यांचे सामाजिक व राजकीय कार्य फार महत्वाचे राहिले. आदिवासिंच्या हक्कासाठी त्यांनी ६ डिसेंबर १९६० ला नागपूर विधानसभेवर ६० हजार लोकांसह अभूतपूर्व मोर्चा काढला. त्यांनी स्वतंत्र गोंडवाना राज्याची मागणी केली. नारायण सिंग उईके यांनी गरीब तसेच मागासलेल्यांच्या अधिकाराच्या रक्षणासाठी समर्थपणे लढा दिला व संपूर्ण जीवन आदिवासीसाठी समर्पित केले. अशाप्रकारे आडे सरांनी नारायण सिंघ उईके यांच्या जीवन प्रवासावर प्रकाश टाकला.

निबंध स्पर्धेचे आयोजन
सावरखेड आश्रम शाळेमध्ये “आदिवासी क्रांतिकारकांचा गौरवशाली इतिहास व आदर्श संस्कृती “
यावर आधारित निबंध स्पर्धेचे आयोजन केले, यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष ए.सी. झलके सर होते तर प्रा.अमर कोंडापलकूलवार व प्राथमिक चे सुपारे सर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन प्रा. आडेकर सर प्रा.येडमे सर, प्रा. कोट्टागिरीवार सर, प्रा. बुरखंडे सर व प्रा.नक्षणे ( घुमे )मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गजानन खोले सर यांनी केले, प्रास्ताविक श्री येडमे सर यांनी केले
आभार प्रदर्शन प्रा. खर्चे (चोपडे) मॅडम यांनी केले.
कार्यक्रमाला सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
सर्व कर्मचाऱ्यांच्या सहयोगाने कार्यक्रम यशस्वी झाल्याचे समाधान सर्वांच्या चेहऱ्यावर दिसून येत होते.